शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

शेतकऱ्यांनी भरला साडेसात लाख विमा

By admin | Updated: September 23, 2014 01:35 IST

उस्मानाबाद : यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीलाच पावसाने ओढ दिल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा संरक्षित केला आहे.

उस्मानाबाद : यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीलाच पावसाने ओढ दिल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा संरक्षित केला आहे. सुमारे ७ लाख ४५ हजार ३९० शेतकऱ्यांनी १४ कोटी ९३ लाख १६ हजार रुपये पीक विम्यापोटी भरल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली असून, महाराष्ट्रात सर्वाधिक खरीप विमा उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात गतवर्षीही दुष्काळजन्य परिस्थिती होती. यंदाही उशिराने झालेल्या अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली होती. कृषी विभागाने खरीप पेरणीसाठी ३ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. वेळेवर पेरणी उरकेल, अशी अपेक्षा असतानाच पावसाने ओढ दिली. अख्खा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरूवातीला सलगत तीन-चार दिवस संततधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली. आजघडीला ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झाली आहे. दरम्यान, निसर्गाच्या अवकृपेमुळे पिके हाती लागतील की नाही, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा अधिकाधिक पिके संरक्षित करण्यासाठी शेतकरी पुढे आल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. उस्मानाबाद तालुक्यातून १ लाख ४१ हजार ५२९ शेतकऱ्यांनी ३ कोटी १९ लाख ९१ हजार रुपये विमा हप्ता भरून पिके संरक्षित केली आहेत. याशिवाय तुळजापूर तालुक्यातून १ लाख २२ हजार ९०० शेतकऱ्यांनी २ कोटी ३० लाख ३३ हजार रुपये, उमरगा तालुक्यातून १ लाख २२ हजार ९० शेतकऱ्यांनी २ कोटी ५७ लाख २७ हजार रुपये, लोहारा तालुक्यातून ५६ हजार ५३९ शेतकऱ्यांनी १ कोटी ३३ लाख ६७ हजार, परंडा तालुक्यातून ६५ हजार ७१७ शेतकऱ्यांनी १ कोटी १२ लाख ६० हजार, भूम तालुक्यातून ४८ हजार ९०८ शेतकऱ्यांनी १ कोटी ९७ हजार, कळंब तालुक्यातून १ लाख २६ हजार ६३८ शेतकऱ्यांनी २ कोटी २८ लाख २ हजार तर वाशी तालुक्यातून ६१ हजार ६९ शेतकऱ्यांनी १ कोटी १० लाख ३९ हजार असे एकूण ७ लाख ४५ हजार ३९० सभासद शेतकऱ्यांनी १४ कोटी ९३ लाख १६ हजार रुपयांचा विक्रमी पिक भरला आहे. दरम्यान, महाराष्ट्र सर्वाधिक पिक विमा भरण्यामध्ये उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.