शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

राष्ट्रीयकृत बँकेतही शेतकऱ्याची अवहेलनाच

By admin | Updated: December 13, 2014 23:35 IST

पाटोदा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र अर्थार्जन मिळावे या करीता शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता

पाटोदा: सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र अर्थार्जन मिळावे या करीता शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता. राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक विमा स्वीकारला जात नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बँकेच्या आडमुठेपणाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.दुष्काळी स्थितीमध्ये धास्तावलेल्या शेतकऱ्यांना एका बाजूस मदत दिली जाणार असल्याच्या घोषणांचा पाऊस पडत आहे. मात्र प्रत्यक्षात ही मदत केंव्हा मिळेल याबाबत साशंकता आहे. गतवर्षी पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांचा मोठ्या प्रमाणावर विमा उतरविला होता. त्यामधून नुकसान झालेल्या पिकांची रक्कम मिळणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगली होती. त्याचा बँकांनाही बऱ्यापैकी फायदा झाल्याचेही दिसून आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे १ कोटी रुपये एवढा निधी मिळाला. यंदाच्या खरीपाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठी जोखीम स्वीकारली. पीक विम्याच्या किचकट नियमावलीबाबत साशंकता असतानाही जवळपास १ कोटी रुपये हप्त्यापोटी बँकेत भरणा केले आहेत. कृषी विभागाने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरावा म्हणून आवाहन केले होते. तर दुष्काळामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला आहे. अजूनही ३१ डिसेंबर पर्यंत पीक विमा उतरविला जाणार आहे. पीक विमा कुठल्याही बँकेत जमा करता येतो. मात्र शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेतच खाते असल्याने या बँकेकडेच ओढा वाढला आहे. येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पीक विमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना विमा स्वीकारला जात नसल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे अगोदरच दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांची राष्ट्रीयकृत बँकेकडूनही अवहेलना होत आहे. अनेक वेळा खेटे मारूनही पीक विम्याबाबतचे काम पूर्ण केले जात नाही. विम्याबाबतच्या किचकट प्रक्रियेची शेतकऱ्यांकडून पुर्तता केली जात आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांकडून त्याला योग्य असा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून दुरावलेले आहेत. ३१ डिसेंबर ही पिक विम्यासाठी शेवटची तारीख असल्याने बँक परिसरात शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. मात्र येथील कर्मचाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्यांना निराशेनेच परतीचा मार्ग धरावा लागत आहे. (वार्ताहर)राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी, अधिकारी हे शेतकऱ्यांना तुच्छ वागणूक देत आहेत. तर धनदांडग्यांना कर्ज पुरवठा करत आहेत. हा दुजाभाव शेतकरी आणि इतरांमध्ये केला जात आहे. कर्जमंजुरी असूनही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज वितरित केले जात नाही. - राजाभाऊ देशमुख, सामाजिक कार्यकर्तेपीक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांच्या हाती पंधरवाडा राहिलेला आहे. पीक विमा उतरवावा याकरीता विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना गळ घातली आहे. विमा उतरविल्यानंतर पुन्हा त्याची पुर्तता होत नसल्याचे यापूर्वी अनेक वेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली होती. पीक विमा काढण्याचा कालावधी संपत आला असताना बँकेचे व्यवस्थापक पीक विमा स्वीकारण्याबाबत वरिष्ठांकडून आदेश नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.