शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला सोळा कोटींचा पीक विमा

By admin | Updated: September 1, 2014 01:06 IST

जालना : गतवर्षी पीक विमापोटी शासनाने ४४ कोटी ६४ लाख रूपयांची मदत दिली. त्याचा मोठा आधार मिळाल्याने यंदाच्यावर्षी सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी १६ कोटी ६१ लाख रूपयांचा पीक विमा उतरविला आहे.

जालना : गतवर्षी पीक विमापोटी शासनाने ४४ कोटी ६४ लाख रूपयांची मदत दिली. त्याचा मोठा आधार मिळाल्याने यंदाच्यावर्षी सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांनी १६ कोटी ६१ लाख रूपयांचा पीक विमा उतरविला आहे. यापेक्षाही जास्त नोंदणीची अपेक्षा होती. मात्र महसूल विभागाने पीक विमा नोंदी घेण्यास निष्काळजीपणा केल्याने अनेकांना फटका बसला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पीक विमा उतरवून घेण्यासाठी सर्वच ६४ शाखांमध्ये मोठी मोहीम राबविली.जिल्हा बँकेच्या वतीने ज्या शाखांमध्ये कर्मचारी कमी आहेत.त्याठिकाणी जास्तीची कर्मचारी पाठवून बँकेत आलेला एकही शेतकरी परत जाणार नाही, याची काळजी घेतली. कपाशी पिकासाठी तब्बल २ लाख ५० हजार ते ७५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सर्वच पिकांसाठी विमा उतरविण्याची संधी शासनाने दिली होती. नियोजित वेळेत विमा उतरविण्यात अपयशी ठरलेल्या शेतकऱ्यांही एक संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. जवळपास पिकांना विमा कवच देण्यात आले. महसूल विभागाच्या तलाठ्यांनी यंदाच्यावर्षी केवळ ऊस, कांदा व कापूस या पिकांनाच विमा असल्याचे सांगून शेतकऱ्यांना नोंदी न घेता परत पाठविल्याच्या घटनाही आहेत. जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरणात गांभिर्याने विचार करून कारवाई केल्यास पुन्हा एकदा वंचित शेतकऱ्यांना लाभ घेता येईल, असे वंचित शेतकरी गोपीचंद जटावाले यांनी सांगितले. आतापर्यंत ऊस आणि कांदा पिकाला विम्याचा लाभ देण्यात आला नाही. जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक एस. आर. पाटील यांनी सांगितले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक कपाशीसाठी पीक विमा उतरविला आहे. नोंदणीची संपूर्ण यादी तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत १६ कोटी ६१ लाख रूपयांचा विमा उतरविला आहे.सर्वच शाखांमध्ये विमा नोंदविण्याचे काम सुरू होते. एकाही शेतकऱ्याला पीक विमा उतरवितांना त्रास झाला नाही. ही समाधानाची बाब आहे.शासन व विमा कंपनीकडे वेळेत प्रस्ताव सादर करण्यात येत आहे. त्यामुळे विमा उतरविल्यानंतर त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होईल. यंदाच्या वर्षी पावसाने दगाफटका दिल्याने शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ होईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)