शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हिरवा चारा महागल्याने शेतकरी संकटात

By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST

कडा : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आष्टी तालुक्यात सध्या हिरव्या चाऱ्याचे दर कमालीचे वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे चाराच नसल्याने त्यांना चारा विकत घ्यावा लागत आहे.

कडा : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आष्टी तालुक्यात सध्या हिरव्या चाऱ्याचे दर कमालीचे वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे चाराच नसल्याने त्यांना चारा विकत घ्यावा लागत आहे. परिणामी दुग्धोत्पादनही घटले आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे विकली आहेत. आष्टी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा फेरा आहे. या तालुक्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो. यामुळे आहे त्या पाण्यावर शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. या तालुक्यात डोंगराळ भागही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सुपिक जमीन इतर तालुक्यांच्या तुलनेने कमीच आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करतात. पाणीटंचाई व उन्हाळ्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे हिरव्या चाऱ्यांचाही अभाव आहे. त्यामुळे जनावरांसाठी शेतकऱ्यांना हिरवा चारा विकत घ्यावा लागतो. काही शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे हिरवा चारा जोपासला आहे. हा चारा आता २८०० ते ३ हजार प्रतिटन मिळत आहे. यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होत असल्याने शेतकरीही अडचणीत आले आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरे विकली असल्याचे जिजामाता दुध संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कर्डीले यांनी सांगितले. गेल्या वर्षी आष्टी तालुक्यात चारा छावण्या उभारल्या होत्या. त्यावेळी तालुक्यात तब्बल तीन ते साडेतीन लाख दुधाचे उत्पादन होत होते. आता हे दुग्धोत्पादन केवळ दीड लाख लिटरवर आले आहे. दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी कडा बाजार समितीच्या आवारातून दररोज २८ ते ३० टन ऊसाची खरेदी करत असल्याचेही दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी व दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी प्रशासनाने गावोगावी पाहणी करून जनावरांसाठी त्वरीत चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी रवि ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अंकुश तळेकर यांनी केली आहे. प्रशासन म्हणते उपाययोजना करूतालुक्यात सध्या चारा, पाणीटंचाई आहे. यामुळे जनावरांचेही हाल होत आहेत. या संदर्भात तहसीलदार राजीव शिंदे म्हणाले, वरिष्ठांना अहवाल पाठवून उपाययोजना करण्यात येतील. (वार्ताहर)पशुधनाची बेभाव विक्री करू नयेआष्टी तालुक्यात दुग्धोत्पादनासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर दुधाळ जनावरे आहेत.चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्री करू नये, असे आवाहन माजी आ. साहेबराव दरेकर यांनी केले.