शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

हिरवा चारा महागल्याने शेतकरी संकटात

By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST

कडा : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आष्टी तालुक्यात सध्या हिरव्या चाऱ्याचे दर कमालीचे वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे चाराच नसल्याने त्यांना चारा विकत घ्यावा लागत आहे.

कडा : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आष्टी तालुक्यात सध्या हिरव्या चाऱ्याचे दर कमालीचे वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे चाराच नसल्याने त्यांना चारा विकत घ्यावा लागत आहे. परिणामी दुग्धोत्पादनही घटले आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे विकली आहेत. आष्टी तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा फेरा आहे. या तालुक्यात बीड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो. यामुळे आहे त्या पाण्यावर शेतकऱ्यांना अवलंबून रहावे लागते. या तालुक्यात डोंगराळ भागही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सुपिक जमीन इतर तालुक्यांच्या तुलनेने कमीच आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करतात. पाणीटंचाई व उन्हाळ्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे हिरव्या चाऱ्यांचाही अभाव आहे. त्यामुळे जनावरांसाठी शेतकऱ्यांना हिरवा चारा विकत घ्यावा लागतो. काही शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे हिरवा चारा जोपासला आहे. हा चारा आता २८०० ते ३ हजार प्रतिटन मिळत आहे. यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होत असल्याने शेतकरीही अडचणीत आले आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरे विकली असल्याचे जिजामाता दुध संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कर्डीले यांनी सांगितले. गेल्या वर्षी आष्टी तालुक्यात चारा छावण्या उभारल्या होत्या. त्यावेळी तालुक्यात तब्बल तीन ते साडेतीन लाख दुधाचे उत्पादन होत होते. आता हे दुग्धोत्पादन केवळ दीड लाख लिटरवर आले आहे. दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी कडा बाजार समितीच्या आवारातून दररोज २८ ते ३० टन ऊसाची खरेदी करत असल्याचेही दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी व दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी प्रशासनाने गावोगावी पाहणी करून जनावरांसाठी त्वरीत चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी रवि ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अंकुश तळेकर यांनी केली आहे. प्रशासन म्हणते उपाययोजना करूतालुक्यात सध्या चारा, पाणीटंचाई आहे. यामुळे जनावरांचेही हाल होत आहेत. या संदर्भात तहसीलदार राजीव शिंदे म्हणाले, वरिष्ठांना अहवाल पाठवून उपाययोजना करण्यात येतील. (वार्ताहर)पशुधनाची बेभाव विक्री करू नयेआष्टी तालुक्यात दुग्धोत्पादनासाठी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर दुधाळ जनावरे आहेत.चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्री करू नये, असे आवाहन माजी आ. साहेबराव दरेकर यांनी केले.