शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

भावकीच्या जुन्या वादातून शेतकर्‍याचा खून

By admin | Updated: May 14, 2014 00:41 IST

जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे भावकीच्या जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात अंकुश भिकाजी चिडे यांच्यावर कुºहाड व विळ्याने हल्ला करण्यात आला.

जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे भावकीच्या जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात अंकुश भिकाजी चिडे यांच्यावर कुºहाड व विळ्याने हल्ला करण्यात आला. घाटी दवाखान्यात घेऊन जातांना करमाड येथे ते मरण पावले. ही घटना १२ मे २०१४ रोजी रात्री ९.३० वाजता घडली. अहंकार देऊळगाव येथे चिडे कुटुंबांची शेती आहे. सर्वांची शेती लगत असल्यामुळे सर्वांनाच एक - दुसर्‍याच्या शेतातून जावे लागते. काही जणांनी रस्ता अडवून वाद निर्माण केला होता. हे प्रकरण प्रचंड विकोपाला गेले. ३ मार्च रोजी चिडे कुटुंबियांच्या दोन गटात किरकोळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकां विरोधात तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. दोन्ही गटांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे काही दिवस वाद थांबला होता. १२ मे रोजी रात्री अंकुश चिडे यांच्या शेत वस्तीवरील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे ते रोहित्रावर गेले. त्यांनी रोहित्रावरील उडालेला फ्यूज बसविला. तेथून परत येत असतांना त्यांना गोरखनाथ माधवराव चिडे याने अटकाव केला. आमच्या शेतातून का जातोस म्हणून वाद घातला. एवढ्यात माधवराव शेकूजी चिडे व कासाबाई माधवराव चिडे हे दोघे कुºहाड व विळा हातात ेघेऊन आले. आईच्या हातातील कुºहाड घेऊन गोरखनाथ चिडे याने अंकुश चिडेवर जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याचे पाहून शेत वस्तीवरून संगीता अंकुश चिडे व संतोष भिकाजी चिडे हे धावत घटनास्थळी आले. त्यांच्यावरही हल्ला करून जखमी करण्यात आले. या सर्व जखमींना जालना येथे खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र अंकुश भिकाजी चिडे (३५) यांची प्रकृती गंभीर असल्याने सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आले. रुग्णाची गंभीर अवस्था पाहून नातेवाईकांना औरंगाबाद येथे घाटी दवाखान्यात जाण्याचा वैद्यकीय अधिकार्‍यांनी सल्ला दिला. अंकुश चिडे यांना औरंगाबादला घेऊन जात असतानाच रात्री २ वाजेच्या सुुमारास त्यांचे करमाड येथे निधन झाले. त्यामुळे नातेवाईकांनी गाडी परत फिरवून जालना येथे सरकारी दवाखान्यात मृतदेह आणला. सदर प्रकरणात तालुका जालना पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन जायभाये यांच्यासह कमलाकर अंभोरे, ज्ञानदेव नागरे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नातेवाईकांना शांत केले. पूर्वी दाखल केलेला भादवि कलम ३०७ गुन्ह्यात भादंवि कलम ३०२ नुसार नोंद घेतली. यात आरोपी गोरखनाथ, माधवराव व कासाबाई यांना अटक करण्यात आली. अधिक तपास जायभाये करीत आहेत. (प्रतिनिधी)