शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणमुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:02 IST

गंगापूर : यंदा सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला; परंतु अतिवृष्टीने बळीराजाच्या ...

गंगापूर : यंदा सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला; परंतु अतिवृष्टीने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यानंतर सततच्या ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामालाही फटका बसला. आता पिकांना काही अंशी अनुकूल वातावरण आहे. मात्र, महावितरणकडून केल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

एकीकडे उद्याेगधंद्यांना चोवीस तास वीजपुरवठा दिला जातो, तर दुसरीकडे मात्र शेतीसाठी दिवसा आठ व रात्री दहा तासच वीजपुरवठा होतो. त्यातही दिवसा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पाणी उपसा करणे शक्य होत नाही. त्यामुळे विजेचा लंपडाव सुरू असतो, तर रात्री वीजपुरवठा मिळत असला तरी शेतकरऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दिवसाच्या तुलनेत रात्री थंडी अधिक असते. अंधारात शॉक लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय बिबट्यासारख्या जंगली जनावरांच्या भीतीने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन पाणी द्यावे लागते. गंगापूर, ढोरेगाव, वरखेड, जामगाव व कानडगाव या गोदा पट्ट्यातील उपकेंद्रांना नेहमी कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी प्रतिकूल हवामानामुळे शेती व शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो. मोठ्या परिश्रमाने शेतकरी यावर मात करतात; परंतु महावितरणच्या लहरीपणाचा फटका वीज पुरवठ्यामुळे पिकांची धूळधाण होऊ पाहत आहे. त्यामुळे यावर्षी पाणी असूनही ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

कोट :

एका रोहित्रावर मर्यादेपेक्षा जास्त नोंदणी नसलेल्या जोडणी असल्याने वीज वितरणावर थेट परिणाम होतो. त्यामुळे आमची विनंती आहे, की शेतकऱ्यांनी ‘कृषी वीज धोरण-२०२०’ या योजनेंतर्गत नोंदणी करून आपली जोडणी अधिकृत करावी. जेणेकरून वीज मागणीच्या प्रमाणात पुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना पायाभूत सेवा मिळतील. - रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.

लॉकडाऊनमध्ये सगळं जग थांबलं असताना शेतकऱ्यांनी सगळ्यांना जगविले. त्यामुळे उद्योगासारखी शेतीलादेखील चोवीस तास मुबलक वीज मिळाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील. - भाऊसाहेब शेळके पाटील, शेतकरी.

फोटो : दोन