शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणमुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:02 IST

गंगापूर : यंदा सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला; परंतु अतिवृष्टीने बळीराजाच्या ...

गंगापूर : यंदा सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला; परंतु अतिवृष्टीने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यानंतर सततच्या ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामालाही फटका बसला. आता पिकांना काही अंशी अनुकूल वातावरण आहे. मात्र, महावितरणकडून केल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

एकीकडे उद्याेगधंद्यांना चोवीस तास वीजपुरवठा दिला जातो, तर दुसरीकडे मात्र शेतीसाठी दिवसा आठ व रात्री दहा तासच वीजपुरवठा होतो. त्यातही दिवसा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पाणी उपसा करणे शक्य होत नाही. त्यामुळे विजेचा लंपडाव सुरू असतो, तर रात्री वीजपुरवठा मिळत असला तरी शेतकरऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दिवसाच्या तुलनेत रात्री थंडी अधिक असते. अंधारात शॉक लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय बिबट्यासारख्या जंगली जनावरांच्या भीतीने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन पाणी द्यावे लागते. गंगापूर, ढोरेगाव, वरखेड, जामगाव व कानडगाव या गोदा पट्ट्यातील उपकेंद्रांना नेहमी कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी प्रतिकूल हवामानामुळे शेती व शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो. मोठ्या परिश्रमाने शेतकरी यावर मात करतात; परंतु महावितरणच्या लहरीपणाचा फटका वीज पुरवठ्यामुळे पिकांची धूळधाण होऊ पाहत आहे. त्यामुळे यावर्षी पाणी असूनही ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

कोट :

एका रोहित्रावर मर्यादेपेक्षा जास्त नोंदणी नसलेल्या जोडणी असल्याने वीज वितरणावर थेट परिणाम होतो. त्यामुळे आमची विनंती आहे, की शेतकऱ्यांनी ‘कृषी वीज धोरण-२०२०’ या योजनेंतर्गत नोंदणी करून आपली जोडणी अधिकृत करावी. जेणेकरून वीज मागणीच्या प्रमाणात पुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना पायाभूत सेवा मिळतील. - रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.

लॉकडाऊनमध्ये सगळं जग थांबलं असताना शेतकऱ्यांनी सगळ्यांना जगविले. त्यामुळे उद्योगासारखी शेतीलादेखील चोवीस तास मुबलक वीज मिळाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील. - भाऊसाहेब शेळके पाटील, शेतकरी.

फोटो : दोन