शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

महावितरणमुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:02 IST

गंगापूर : यंदा सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला; परंतु अतिवृष्टीने बळीराजाच्या ...

गंगापूर : यंदा सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला; परंतु अतिवृष्टीने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यानंतर सततच्या ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामालाही फटका बसला. आता पिकांना काही अंशी अनुकूल वातावरण आहे. मात्र, महावितरणकडून केल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

एकीकडे उद्याेगधंद्यांना चोवीस तास वीजपुरवठा दिला जातो, तर दुसरीकडे मात्र शेतीसाठी दिवसा आठ व रात्री दहा तासच वीजपुरवठा होतो. त्यातही दिवसा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पाणी उपसा करणे शक्य होत नाही. त्यामुळे विजेचा लंपडाव सुरू असतो, तर रात्री वीजपुरवठा मिळत असला तरी शेतकरऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दिवसाच्या तुलनेत रात्री थंडी अधिक असते. अंधारात शॉक लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय बिबट्यासारख्या जंगली जनावरांच्या भीतीने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन पाणी द्यावे लागते. गंगापूर, ढोरेगाव, वरखेड, जामगाव व कानडगाव या गोदा पट्ट्यातील उपकेंद्रांना नेहमी कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी प्रतिकूल हवामानामुळे शेती व शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो. मोठ्या परिश्रमाने शेतकरी यावर मात करतात; परंतु महावितरणच्या लहरीपणाचा फटका वीज पुरवठ्यामुळे पिकांची धूळधाण होऊ पाहत आहे. त्यामुळे यावर्षी पाणी असूनही ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

कोट :

एका रोहित्रावर मर्यादेपेक्षा जास्त नोंदणी नसलेल्या जोडणी असल्याने वीज वितरणावर थेट परिणाम होतो. त्यामुळे आमची विनंती आहे, की शेतकऱ्यांनी ‘कृषी वीज धोरण-२०२०’ या योजनेंतर्गत नोंदणी करून आपली जोडणी अधिकृत करावी. जेणेकरून वीज मागणीच्या प्रमाणात पुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना पायाभूत सेवा मिळतील. - रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.

लॉकडाऊनमध्ये सगळं जग थांबलं असताना शेतकऱ्यांनी सगळ्यांना जगविले. त्यामुळे उद्योगासारखी शेतीलादेखील चोवीस तास मुबलक वीज मिळाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील. - भाऊसाहेब शेळके पाटील, शेतकरी.

फोटो : दोन