शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

जनजागृतीअभावी शेतकरी विम्यापासून वंचित

By admin | Updated: July 7, 2014 00:11 IST

चापोली : शासनाने यंदा प्रथमच खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीकविमा योजना सुरू केली आहे.

चापोली : शासनाने यंदा प्रथमच खरीप हंगामासाठी हवामानावर आधारित पीकविमा योजना सुरू केली आहे. मात्र या विमा योजनेची वेळीच जनजागृती झाली नसल्याने या योजनेबाबत शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे चापोलीतील अनेक शेतकरी या विमा योजनेपासून वंचित राहिले.हवामान घटकांच्या धोक्यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाने हवामानावर आधारित पीकविमा योजना सुरू केली. मात्र योजनेची जनजागृतीच झाली नाही. परिणामी ज्या शेतकऱ्यांना या विमा योजनेची माहिती मिळाली, त्यांनी पिकांचा विमा उतरविला. विम्यासाठी सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-ई सेवा केंद्र, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतमध्ये गर्दी झाली होती़ व सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गर्दी झाली होती. गेल्या वर्षीच्या खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षी पेरणी झाल्यावर पावसाने उघाड दिली होती व नंतर तब्बल २० ते २५ दिवस सतत भिज पाऊस पडला. यामुळे पिकांची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळच भेटला नाही. सोयाबीन काढणी वेळेस परत पावसाने झोडपले. याचा परिणाम उत्पन्नावर होऊन उत्पन्न घटले. तसेच रबी हंगामही गारपिटीमुळे हातचा गेला. गेल्या वर्षीचा हंगाम हा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचा गेला. सध्याची परिस्थिती ही चिंताग्रस्त करणारी आहे. अजूनही परिसरात १ टक्काही पेरणी झाली नाही. या पीकविमा योजना शेतकऱ्यांचे डोळे पुसण्याचे काम करणार होती. मात्र यापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. (वार्ताहर)७४९ शेतकऱ्यांनी भरला विमा...चापोली परिसरातील चापोलीसह शंकरवाडी, ब्रह्मवाडी, अजनसोंडा, येणगेवाडी, आनंदवाडी, हिंपळनेर, नायगाव, हणमंत जवळगा, लिंबवाडी या गावातील ७४९ शेतकऱ्यांनी ११ लाख ११ हजार रुपयांचा पीकविमा भरल्याची माहिती चापोली येथील मध्यवर्ती बँकेकडून मिळाली आहे. हा पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी तुकाराम कासले यांच्याशी संपर्क साधला असता मुदतवाढ मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले़