शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने शेतकºयांची चिंंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:54 IST

भोकरदन तालुक्यात पंधरा ते वीस दिवसांपासुन पावसाने दंडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंंता वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यात पंधरा ते वीस दिवसांपासुन पावसाने दंडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंंता वाढली आहे. या पावसाचा बाजारपेठेवर परिणाम झाला असून कृषीशी संबधित बाजारपेठेत अक्षरश: शुकशुकाट दिसत आहे़तालुक्यात सुरूवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पिकाची लागवड मृग नक्षत्रात करण्यात आली. त्यामुळे शेतकरी सुरूवातीला समाधानी होता. कारण मराठवाड्यात सर्वाधिक चांगली परिस्थिती भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यात होती. त्यामुळे शेतकºयांनी पिकांसाठी लागणारा सर्व खर्च केला पीके सुध्दा चांगली जोमात असल्यामुळे शेतीतून निघणाºया उत्पादनाचे आकडेमोड शेतकरी करू लागले होते. परंतु, दरम्यानच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकºयांनी केलेला खर्च सुध्दा वाया गेला आहे.काही ठिकाणी मका हे पीक केवळ जनावरासाठी चारा म्हणून उपयोगात येणार आहे. तर सोयाबीन फुलोºयात असताना जागेवरच करपून जात आहे. मूग, उडीद या पिकेसुद्धा अशाच स्थितीत आहेत. केवळ मिरची व कपाशीचे पीक सध्या शेतात तग धरून उभे आहे. पुढील पाच दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर कपाशीचे पीकदेखील हातचे जाईल, असे चित्र आहे.तालुक्यातील राजूर, हसणाबाद, तळेगाव, पिंपळगाव कोलते, रजाळा, निमगाव, मुठाड, कुंभारी, इब्राहिमपूर, आव्हाणा, मालखेडा, भोकरदन, सोयगाव देवी, केदारखेडा, सिपोरा बजार, दानापूर, वडशेद, देहेड, वाकडी, आन्वा, जळगाव सपकाळ, धावडा, वालसांवगी, पिपळगाव रेणुकाई, पारध या भागातील पीकानी माना टाकल्या आहेत.जलयुक्त शिवार योजनेची ज्या भागात कामे करण्यात आली व त्या गावाच्या परिसरात शेतकºयांच्या विहिरींचा पाणीसाठा चांगला आहे. या पाण्याच्या आधारावर शेतकरी आपली पिके जगवीत आहेत.बाजारपेठावर मोठा परिणामतालुक्यातील व्यापार हा केवळ शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी सुखी तर व्यापारी सुखी अशी सांगड ग्रामीण भागात आहे.गेल्या वीस दिवसापासून शेतकºयांनी होते नव्हते ते शेतात टाकून दिले. शिवाय पुढे काही हातात येईल यांची गॅरंटी नसल्यामुळे शेतकºयांनी आखडता हात घेत खरेदी बंद केली आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्वच बाजारपेठा ओस पडल्या आहेत. कृषी सेवा केंद्रावर या दिवसामध्ये गर्दी असायची आता तर एक ग्राहक दिसत नाही़