शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:26 IST

परभणी : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काही कंपन्यांकडून घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी बियाणांची पेरणीनंतर उगवण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काही कंपन्यांकडून घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी बियाणांची पेरणीनंतर उगवण झाली नसल्याच्या २३८ शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत कृषी विभागाच्या झालेल्या बैठकीत तक्रारी केल्या. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी व पशूसंवर्धन सभापती श्रीनिवास मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. खरीप हंगामाच्या प्रारंभी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, कापूस, ज्वारी आदींचे काही कंपन्यांचे बियाणे खरेदी केले होते. त्यातील काही मोजक्या कंपन्याकडून फसवणूक झाली व पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी या शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जि.प.कृषी सभापती यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी गुरुवारी विविध कंपन्यांचे अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी, गुणनियंत्रण अधिकारी आदींची बैठक बोलावली होती. या बैठकीस प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख यांचीही उपस्थिती होती. जि.प.च्या सभागृहात झालेल्या या बैठकीत सोनपेठ तालुक्यातील १७१, पाथरी तालुक्यातील ६२ व परभणी तालुक्यातील ५ अशा एकूण २३८ शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या. त्यामध्ये पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील शेतकऱ्यांनी मल्लिका २०७ कापूस बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली. या अनुषंगाने कृषी अधिकारी स्मिता कुपटेकर यांनी या तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या असून त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे सांगितले. सोनपेठ तालुक्यातील १७१ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यामध्ये नरवाडी येथील शेतकऱ्यांनी कापूस बियाणे २०७ व तृणनाशक फवारणीचे औषध या अनुषंगाने तक्रारी केल्या. या अनुषंगाने केलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप अप्राप्त असून अहवालानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. गंगाखेड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनीही मल्लिका २०७ बियाणे व तृणनाशक फवारणी औषधी संदर्भात तक्रार केली. तालुक्यातील तीन तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. परंतु, कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. परभणी तालुक्यातील ५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीत सोयाबीन उगवले नसल्याचे व तृणनाशक औषधी याची नोंद आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कंपन्यांनी फसवणूक केल्याचेही सांगितले. या संदर्भातील तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्या असून अधिकारी उपलब्ध न झाल्याने त्याचे निरसन झाले नाही, असे सांगण्यात आले. मानवत तालुक्यातून एक तक्रार प्राप्त झाली असून याबाबतचा अहवाल कृषी अधीक्षकांकडे पाठविण्यात आला असल्याचे कृषी अधिकारी एस.टी.तमशेटे यांनी सांगितले. जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू या तालुक्यातून एकही तक्रार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माणिक कदम यांनी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद असतात, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. त्यावर सर्वच कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक चालू ठेवावेत व ते शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन सभापती मुंडे यांनी केले. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. यावेळी कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांचे अभिनंदन केले.