शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:26 IST

परभणी : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काही कंपन्यांकडून घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी बियाणांची पेरणीनंतर उगवण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी काही कंपन्यांकडून घेतलेल्या सोयाबीन, तूर, मूग, ज्वारी बियाणांची पेरणीनंतर उगवण झाली नसल्याच्या २३८ शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत कृषी विभागाच्या झालेल्या बैठकीत तक्रारी केल्या. त्यानंतर या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी व पशूसंवर्धन सभापती श्रीनिवास मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. खरीप हंगामाच्या प्रारंभी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, कापूस, ज्वारी आदींचे काही कंपन्यांचे बियाणे खरेदी केले होते. त्यातील काही मोजक्या कंपन्याकडून फसवणूक झाली व पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी या शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, जि.प.कृषी सभापती यांच्याकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी गुरुवारी विविध कंपन्यांचे अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी, गुणनियंत्रण अधिकारी आदींची बैठक बोलावली होती. या बैठकीस प्रगतशील शेतकरी कांतराव देशमुख यांचीही उपस्थिती होती. जि.प.च्या सभागृहात झालेल्या या बैठकीत सोनपेठ तालुक्यातील १७१, पाथरी तालुक्यातील ६२ व परभणी तालुक्यातील ५ अशा एकूण २३८ शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या. त्यामध्ये पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील शेतकऱ्यांनी मल्लिका २०७ कापूस बियाणांची उगवण झाली नसल्याची तक्रार केली. या अनुषंगाने कृषी अधिकारी स्मिता कुपटेकर यांनी या तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या असून त्याचा अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे सांगितले. सोनपेठ तालुक्यातील १७१ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यामध्ये नरवाडी येथील शेतकऱ्यांनी कापूस बियाणे २०७ व तृणनाशक फवारणीचे औषध या अनुषंगाने तक्रारी केल्या. या अनुषंगाने केलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप अप्राप्त असून अहवालानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले. गंगाखेड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनीही मल्लिका २०७ बियाणे व तृणनाशक फवारणी औषधी संदर्भात तक्रार केली. तालुक्यातील तीन तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्या. परंतु, कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. परभणी तालुक्यातील ५ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीत सोयाबीन उगवले नसल्याचे व तृणनाशक औषधी याची नोंद आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कंपन्यांनी फसवणूक केल्याचेही सांगितले. या संदर्भातील तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्या असून अधिकारी उपलब्ध न झाल्याने त्याचे निरसन झाले नाही, असे सांगण्यात आले. मानवत तालुक्यातून एक तक्रार प्राप्त झाली असून याबाबतचा अहवाल कृषी अधीक्षकांकडे पाठविण्यात आला असल्याचे कृषी अधिकारी एस.टी.तमशेटे यांनी सांगितले. जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू या तालुक्यातून एकही तक्रार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माणिक कदम यांनी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फोन बंद असतात, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. त्यावर सर्वच कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक चालू ठेवावेत व ते शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावेत, असे आवाहन सभापती मुंडे यांनी केले. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले. यावेळी कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासंदर्भात घेतलेल्या पुढाकाराबाबत त्यांचे अभिनंदन केले.