शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शेतकरी, अधिकाऱ्यांत बाचाबाची

By admin | Updated: July 29, 2015 00:48 IST

उस्मानाबाद : ३१ जुलैै पूर्वी पीकविमा भरण्यासाठी शहरासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह इतर शाखांमध्ये मोठी गर्दी केली आहे़

उस्मानाबाद : ३१ जुलैै पूर्वी पीकविमा भरण्यासाठी शहरासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह इतर शाखांमध्ये मोठी गर्दी केली आहे़ शिवाय मंजूर नुकसान भरपाईची रक्कम काढण्यासाठीही बँकेत गर्दी होताना दिसत आहे़ शहरातील जिजाऊ चौक परिसरातील तांबरी विभागातील शाखेत मंगळवारी दुपारी पीकविमा भरून घेण्यास काही कर्मचाऱ्यांनी नकार दिला होता़ परिणामी तासंतास रांगेत थांबलेल्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याने अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली़एकीकडे पावसाने ओढ दिल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत़ परिणामी शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहेत़ त्यातच पीकविमा भरण्यासाठी पीकपेरा मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत होती़ शेतकऱ्यांकडून तक्रारी दाखल होताच जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठी, कृषी सहाय्यकांनी पीकपेरा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना देण्याबाबत सूचित केले होते़ आता पीकपेरा मिळाला असला तरी काही बँकांमध्ये पीकविमा भरून घेण्यात येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत़ असाच प्रकार मंगळवारी दुपारी उस्मानाबाद येथील तांबरी विभागातील जिल्हा बँकेच्या शाखेत दिसून आला़ शहरासह घाटंग्री व परिसरातील अनेक शेतकरी पीकविमा भरण्यासाठी जिल्हा बँकेच्या शाखेत आले होते़ मात्र, तेथे उपस्थित काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इथे पीकविमा भरून घेतला जाणार नाही़ जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत भरावा, अशा सूचना केल्या़ तसेच नुकसानीची रक्कम उचलण्यास आलेल्या शेतकऱ्यांनाही तासंतास रांगेत उभा राहूनही पैसे मिळत नसल्याने यावेळी संताप व्यक्त केला जात होता़ एकीकडे न मिळणारी नुकसानीचे अनुदान व दुसरीकडे पीकविमा भरून घेण्यास नकार देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच संताप निर्माण झाला़ उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली़ संतापलेल्या काही शेतकऱ्यांनी शाखेच्या कार्यालयाचे शटर खाली ओढून कामकाज बंद पाडले होते़ घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ पोलिसांनी अधिकारी व शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर व्यवहार पूर्ववत झाले़ (प्रतिनिधी)