शहरं
Join us  
Trending Stories
1
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
2
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
3
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
4
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
5
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
6
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
7
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
8
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
9
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
10
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
11
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
12
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
13
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
14
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
15
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
16
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
17
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
18
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
19
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
20
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!

शेतकऱ्याची नजर ऊस शेतीच्या पलिकडे

By admin | Updated: December 19, 2015 23:44 IST

उस्मानाबाद : पावसाअभावी जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. दुष्काळाची ही तीव्रता वाढविण्यात मागील काही वर्षांत जिल्ह्यात फोफावलेल्या ऊस उत्पादनाचा वाटाही मोठा आहे.

उस्मानाबाद : पावसाअभावी जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. दुष्काळाची ही तीव्रता वाढविण्यात मागील काही वर्षांत जिल्ह्यात फोफावलेल्या ऊस उत्पादनाचा वाटाही मोठा आहे. त्यामुळेच कृषी विभागाच्या वतीने पीक पध्दती बदलण्यासाठी ऊस शेतीच्या पलिकडे हे अभियान राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कळंब तालुक्यातील शेतकऱ्याने तब्बल तीन एकरावर ड्रीपच्या माध्यमातून तुरीचे उत्पादन घेतले असून, तुरीची वाढ पाहता हा प्रयोग सर्वार्थाने यशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे.मागील चार वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झालेला नाही. त्यामुळेच बहुतांश सिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. शहरांसह वाड्या-वस्त्यांसमोरही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असून, पिकांची अवस्था दयनीय आहे. भूगर्भातील पाणीपातळीतही अनेक ठिकाणी सुमारे पंधरा मिटर एवढी विक्रमी घट झालेली आहे. मात्र, त्यानंतरही नगदी पीक म्हणून अनेक शेतकरी उसाच्या मागे लागल्याचे चित्र दिसून येत होते. इतर पिकांच्या तुलनेत उसाला जास्तीचे पाणी लागते. दुष्काळी जिल्ह्यात अशा पध्दतीने पाण्याचा होत असलेला उपसा पाहता भविष्यात येथील पूर्ण शेती व्यवस्थाच उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या पुढाकाराने ‘ऊस शेतीच्या पलिकडे’ हा अभिनव उपक्रम जिल्ह्यात राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाला जिल्ह्यातील अनेक शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. कळंब तालुक्यातील आंदोरा येथील दिलीप तांबारे या प्रगतशील शेतकऱ्यानेही या उपक्रमाच्या माध्यमातून पीक पध्दतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. तांबारे यांच्याकडे पूर्वी मोठ्या प्रमाणात ऊस तसेच टरबूज होता. यंदा मात्र त्यांनी उसाचे क्षेत्र कमी केले. याबरोबरच टरबूजही बाजुला करून तेथे तुरीची लागवड केली. टरबुजासाठी त्यांनी ड्रीप घेतलेले होते. याच ड्रीपच्या साह्याने त्यांनी तुरीचे तीन एकर क्षेत्र फुलविले आहे. सद्यस्थितीत ही तूर सहा ते साडेसहा फुटापर्यंत वाढली असून, अत्यल्प पाण्यावर तुरीची भरघोस वाढ झाल्याने त्यांचा उत्साह वाढलेला आहे. पूर्वी उसाला पंधरा दिवसाआड पाणी द्यावे लागत होते. मात्र, महिन्यातून एकदा पाणी देवूनही तुरीचे क्षेत्र हिरवेगार आहे. विशेष म्हणजे, तुरीसाठी केवळ फवारणीचा खर्च झालेला असल्याने अत्यंत कमी खर्चात त्यांना जास्तीचे उत्पादन मिळणार आहे. तीन एकर क्षेत्रात अंदाजे ४५ ते ५० क्विंटल तूर निघेल, असा अंदाज असून, तुरीचा सध्याचा भाव पाहता उसापेक्षा कितीतरी अधिक उत्पादन अपेक्षित असल्याचे तांबारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. उस्मानाबादसारख्या दुष्काळी जिल्ह्यात अशा रितीने पीक पध्दती बदलल्यास शेतकऱ्यांना फायदा तर होणारच आहे. याबरोबरच लाख मोलाचे पाणीही वाचणार आहे.