शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

खोटी कमिटी सहन करणार नाही, फोन लावून चेक करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST

औरंगाबाद : बोगसगिरी चालणार नाही. खोटी कमिटी सहन करणार नाही. खरीच नियुक्ती झाली का हे त्यातल्या पदाधिकाऱ्यांना फोन लावून ...

औरंगाबाद : बोगसगिरी चालणार नाही. खोटी कमिटी सहन करणार नाही. खरीच नियुक्ती झाली का हे त्यातल्या पदाधिकाऱ्यांना फोन लावून चेक करणार आहे. त्यामुळे मला दिलेल्या याद्या खऱ्या असतील तर ठीक आहे. अन्यथा आताच त्या परत घेऊन जा, असे खडे बोल येथे प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी शनिवारी सुनावले.

शहागंजातील गांधी भवनात शनिवार दुपारपासून त्या मराठवाड्यातील महिला काँग्रेसचा जिल्हावार आढावा घेत होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, संघटनेत जीव ओता, मेहनत घ्या. तुमच्यातली ताकद ओळखा. तुमचे काय असेल तर तुम्हाला न्याय मिळणारच. दुसरीकडे न्याय मागण्याची गरज पडणार नाही

भाजपपेक्षाही काँग्रेस हाच पक्ष आहे, जो महिलांना प्राधान्य देतो, सन्मान देतो. जरा गांधी घराण्याचा त्याग आठवा. सोनिया गांधी यांचा त्याग आठवून पहा. परंतु, महिला कार्यकर्त्यांनी आता तक्रारी थांबविल्या पाहिजेत. मने दुखवणे थांबवायला पाहिजे. प्रोटोकॉलमध्ये फार अडकून पडता कामा नये. दुसऱ्यांना नावे ठेवून स्वतःला मोठे होता येत नसते.

प्रत्येक जिल्ह्याला एक वकील देणार, मेडिसिन बॅंक उभारणार या आपल्या आगामी उपक्रमाबद्दल सूतोवाच करीत सव्वालाखे यांनी स्वयंरोजगारातून संघटन‌ उभे करता येते याबद्दलचा विश्वास दिला.

प्रत्येक महिलेला स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा व काम करणाऱ्या कार्यकर्तीला समिती मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिले. मात्र, काम न करता कुणाचीही वशिलेबाजी सहन न करण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी देऊन ठेवला.

सतत डावलले जात असल्याची कॉमन तक्रार...

जवळपास सर्वच जिल्ह्याच्या महिला पदाधिकाऱ्यांची कॉमन तक्रार ऐकू आली. आम्हाला डावलले जाते, प्रोटोकॉल पाळला जात नाही. स्टेजवर बसू दिले जात नाही. छाया मोडेकर यांनी तर घणाघाती भाषण केले. त्यावर उत्तर म्हणून प्रदेश उपाध्यक्षा संगीता धोंडे बोलल्या. प्रदेश सरचिटणीस सरोज मसलगे पाटील, उज्ज्वला दत्त, दीपाली मिसाळ, आदींनी काही सूचना केल्या.

महिला व युवक काँग्रेस मजबूत असेल तरच कुठल्याही निवडणुका जिंकणे सोपे असते याकडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी यावेळी लक्ष वेधले. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा थोरात यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या सरोज नवपुते यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश सचिव मीनाक्षी बर्डे-देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. विमल मापारी यांना काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश देण्यात आला. प्रेरणा खैरे व आणखी काही महिलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

हेमलता मुगदिया, प्रदेश सरचिटणीस सुनीता तायडे-निंबाळकर, जिल्हा अध्यक्षा सुरेखा पानकडे, आदींची मंचावर उपस्थिती होती.