शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:04 IST

गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथील एका तरुणाचा विवाह मालेगाव येथील शिवा राजपूत या दलालमार्फत सध्या नाशिक येथे राहणाऱ्या व ...

गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथील एका तरुणाचा विवाह मालेगाव येथील शिवा राजपूत या दलालमार्फत सध्या नाशिक येथे राहणाऱ्या व मूळ वसमत (जि. हिंगोली) येथील असणाऱ्या उषा रामा लोखंडे या महिलेच्या सोनू या मुलीशी १५ मार्चला माळीवाडगाव येथे झाला होता. २२ मार्चला नवविवाहित सोनूने स्वयंपाकात गुंगीचे औषध टाकून घरातून पोबारा केला. सकाळी नववधू न दिसल्याने शिल्लेगाव पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल केली. यानंतर शंका आल्याने नवविवाहित मुलाने मध्यस्थी करणाऱ्या शिवा राजपूतशी संपर्क साधला, त्याला ही बाब माहिती नसल्याने त्याने मी पुन्हा सदर महिलेशी संपर्क साधून देवनळा येथे मुलगी दाखविण्यास बोलावून घेतो, तुम्ही पोलिसांकरवी त्यांना पकडा म्हणून सांगितले. यानंतर सदर नवविवाहित मुलाने पोलिसांनी ही माहिती दिली. त्यानंतर शिल्लेगाव ठाण्याचे संतोष गिरी, जाधव यांनी शुक्रवारी देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे एपीआय संजय आहिरे, पीएसआय शैलेश जाेगदंड, बिट अंमलदार आप्पासाहेब काळे, राहुल ठोंबरे, किसन गवळी यांच्या मदतीने औरंगाबाद-नाशिकरोडवरील एका हॉटेलसमोर सापळा रचला. ठरल्यानुसार दोन कार (एम.एच.१५ ई,०२५६ व एम.एच.४१एएम०८०९)ने तीन महिला व चार पुरुष उतरले. त्याचवेळी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची लासूर स्टेशन येथील पोलीस चौकीत आणून अधिक चौकशी केली असता या टोळीची मुख्य सूत्रधार हिने तिचे नाव आशा विलास खडसे (रा. रेल्वे स्टेशन, वाशिम)असल्याचे सांगून तिचे सोबत लग्नाकरिता आलेली मुलगी कल्पना सुधाकर पाटील (रा. कासगाव, मुंबई) व सोबत सविता चंद्रकला कुलकर्णी (रा. नाशिक) व नीलेश दिलीप पाटील (रा. नाशिक) असे असल्याचे सांगितले.

यातील मुख्य आरोपी आशा खडसे हिच्या मोबाइलमध्ये एकाच मुलीचे अनेकांशी विवाह लावून दिल्याचे छायाचित्रे सापडल्यानंतर पोलीसही चक्रावले होते. या टोळीतील आरोपींकडून सात मोबाइल व सात बनावट महिलांचे आधारकार्डसह एक कार असा ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने अशाच प्रकारे नाशिक, जळगाव, औरंगाबाद यांसह गुजरात राज्यात बनावट लग्न लावून पैसे उकळून फसवूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.

चौकट

माळीवाडगावच्या तरुणाकडून उकळले अडीच लाख रुपये

ही टोळी प्रामुख्याने एजंटमार्फत लग्नास इच्छुक मुलांची माहिती घेऊन त्यांना घेरत असे. त्यांच्याशी बोलणी करून मुलीचे आई-वडील, मावशी बनून लग्न करुन द्यायचे, नंतर नववधू पोबारा करीत असे. माळीवाडगाव येथील तरुणाकडून या टोळीने अडीच लाख रुपये घेऊन लग्न करून दिले होते. त्यानंतर नववधूने चाळीस हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला आहे.

फोटो : माळीवाडगाव येथील तरुणाशी विवाह करून पळून गेलेली वधू.