शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

निवडणूक निकालाबाबत कमालीची उत्कंठा

By admin | Updated: May 14, 2014 23:59 IST

जालना : जालना व परभणी या दोन लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरूद्ध महायुतीच्या उमेदवारांतील प्रतिष्ठेच्या तुल्यबळ लढतीचा शुक्रवारी मतमोजणीतून निर्णय लाणार आहे.

जालना : जालना व परभणी या दोन लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरूद्ध महायुतीच्या उमेदवारांतील प्रतिष्ठेच्या तुल्यबळ लढतीचा शुक्रवारी मतमोजणीतून निर्णय लाणार असून, राजकीय क्षेत्रासह शहरी व ग्रामीण भागाचेही या निर्णयाकडे पूर्णत: लक्ष केंद्रित झाले आहे. जालना व परभणी या दोन्ही मतदारसंघात चुरशीच्या लढती रंगल्या होत्या. या दोन्हीही लढतीत काँग्रेस आघाडी व महायुतीने सर्व शक्ती पणास लावली. विशेषत: उमेदवारांनी जीवाचे रान केले. विद्यमान खा. रावसाहेब दानवे पाटील (महायुती) व विलास औताडे (काँग्रेस आघाडी) यांनी जालन्यातून, तर आ. संजय जाधव (महायुती) व विजय भांबळे (काँग्रेस आघाडी) या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांनी परभणीतून मोठी रणधुमाळी उडवून प्रचंड चुरस निर्माण केली. या प्रतिस्पर्ध्यांच्या रंगलेल्या लढतीने दोन्ही मतदारसंघातील संपूर्ण वातावरण अक्षरश: ढवळून निघाले होते. राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठांसह नव्या पिढीतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे समर्थन उभे केले. त्यामुळेच शहरी व ग्रामीण भाग अक्षरश: पेटून निघाला. शहरी भागापासून खेडोपाडी, वाडी-तंड्यापर्यंत किमान पंधरा दिवस या तुल्यबळ निवडणुकीचाच विषय चर्चेत होता. ठिकठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांचे ‘प्लस’ व ‘मायनस’ पॉर्इंट, मतविभागणी तसेच पडद्याआड किंवा पडद्यावरच्या खेळ्या, कुरघोड्यांसंदर्भात जाहीरपणे गप्पा रंगल्या होत्या. या दोन्ही मतदारसंघात रणधुमाळीने कळस गाठल्याने पूर्णत: निवडणूकमय वातावरण झाले होते. तरूणांपासून ते अबालवृद्ध व महिलांमधूनसुद्धा निवडणूक एके निवडणूक एवढीच चर्चा राहिली. विशेषत: ऐन लग्नसराईच्या हंगामात रंगलेल्या तुल्यबळ लढतीचा लग्नसराईवर, दैनंदिन व्यवहारासह अन्य गोष्टींवरसुद्धा तीव्र परिणाम उमटल्याचे चित्र जाणवत होते. या पार्श्वभूमीवरच या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल, असा अंदाज होता. विशेषत: मतदारांतील जागृती व प्रतिस्पर्ध्यांनी उडविलेल्या रणधुमाळीचे चित्रच त्यामागे कारणीभूत होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत सोशल मीडियाची भूमिकासुद्धा महत्त्वपूर्ण ठरली. सोशल मीडियानेच संपूर्ण निवडणुकीवर मोठा प्रभाव उमटविला. त्यामुळेच नव्या पिढीत निवडणुकीविषयी प्रचंड आस्था तीव्रतेने जाणवली. या निवडणुकीचे हे वैशिष्ट्यच ठरले. त्याचे प्रत्यंतरसुद्धा मतदानाच्या दिवशी तीव्रपणे जाणवले. १७ व २४ एप्रिल रोजी या दोन्ही मतदारसंघा मतदानाच्या टप्प्यात सकाळपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केंद्र सर्वसामान्य मतदारांच्या गर्दीने फुलून गेले होते. शहरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या. ज्येष्ठांपासून ते नव्या पिढीतील मतदारांनी स्वत: उत्स्फूर्तपणे मतदान करीत कुटुंबियांचे किंवा नात्या-गोत्यांसह शेजार्‍यापाजार्‍यांचे मतदान झाले की नाही, याची खात्री केली. परिणामी, दोन्ही मतदारसंघांत यावर्षी अभूतपूर्व मतदान झाले. जालना लोकसभेत भोकरदनपाठोपाठ पैठण, बदनापूर या विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी लक्षणीय व अभूतपूर्व ठरली. परभणी लोकसभेत घनसावंगी व परतूर विधानसभेतही लक्षणीय मतदान झाले. दोन्ही मतदारसंघात ठिकठिकाणी मतदारांनी केलेल्या उत्स्फूर्त मतदानाने राजकीय पक्षांसह उमेदवारसुद्धा अक्षरश: भारावून गेले. प्रतिस्पर्ध्यांनी केलेल्या विजयाच्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर आता १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे, त्यातूनच प्रतिस्पर्ध्यांच्या दावे-प्रतिदाव्यांचा निर्णय लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) एक दिवस भारनियमन थांबविण्याची मागणी आप-आपल्या मतदारसंघातील निकालापासून शेजारचे मतदारसंघ, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील निकालांसंदर्भात शहरी व ग्रामीण भागात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच १६ मे रोजी सर्वसामान्य नागरिक टीव्हीसह अन्य माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर निकाल जाणून घेणार, असे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू आहे. त्या भारनियमनाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा तडाखा बसला आहे. रखरखत्या उन्हापाठोपाठ भारनियमनामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्याही स्थितीत निवडणूकमय झालेल्या नागरिकांनी किमान १६ मे रोजी महावितरण कंपनीने भारनियमन थांबवून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.