शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

By admin | Updated: August 28, 2014 01:40 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी सर्वदूर पाऊस झाला असून,

लातूर : लातूर जिल्ह्यात मंगळवार व बुधवारी सर्वदूर पाऊस झाला असून, बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २०.९२ मि.मी. इतका पाऊस झाला. पोळ्याच्या पूर्वसंध्येपासून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.गेल्या महिनाभरापासून पावसाने ताण दिला होता. त्यामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. परंतु, पोळ्याच्या पूर्वसंध्येला सुरु झालेला रिमझिम पाऊस बुधवारपर्यंत कायम राहिला आहे. मंगळवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर मोठा पाऊस झाला. रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. या पावसाळ्यात कोरडेठाक असलेल्या नदीपात्रात काहीअंशी पाणी आले आहे. बुधवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्ह्यातील लातूर, औसा, उदगीर, निलंगा, देवणी, जळकोट, शिरूर अनंतपाळ, अहमदपूर, रेणापूर, चाकूर या तालुक्यांत पाऊस झाला आहे.मंगळवारी लातूर तालुक्यात १.५० मि.मी., औसा तालुक्यात १.४३, रेणापूर तालुक्यात १२.७५, उदगीर ३४, अहमदपूर ७.००, चाकूर ८.२०, जळकोट ३५, निलंगा १३.८८, देवणी २२.३३, शिरूर अनंतपाळ ८.५३ असा एकूण सरासरी १४.४४ मि.मी. पाऊस झाला आहे. तर बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लातूर ३९.६२ मि.मी., औसा २४.८५, रेणापूर १६.००, उदगीर २६.७१, अहमदपूर ११.८३, चाकूर ३३, जळकोट २३, निलंगा ११.३८, देवणी १९.६६, शिरूर अनंतपाळ ३.६६ असा एकूण सरासरी २०.९२ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. हा पाऊस समाधानकारक नसला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतातील पिके वाळू लागली होती तर काही ठिकाणी कोमेजली होती. आता या पावसामुळे पिकांना उभारी येणार आहे. माना टाकत असलेली पिके कालपासून डोलू लागली आहेत.जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा, रावणकोळा, अतनूर परिसरातही मंगळवारी रात्री मोठा पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, नद्या, नाले व ओढ्यांना थोडे पाणी आल्याने बळीराजा सुखावला आहे. (प्रतिनिधी)गतवर्षी जिल्ह्यात सरासरी ६०४.६२ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा २७८.०२ मि.मी. पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३२६.६ मि.मी.ने पाऊस कमी आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे छोट्या नद्या-नाल्यांचे पात्र ओलावले आहे. परंतु, त्यात अद्याप वाहते पाणी नाही. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.४दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, बुधवारी रिमझिम पावसाची बरसात सुरू होती. शिवाय, सूर्यदर्शन न झाल्यामुळे आणखी पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. लातूर शहरात मंगळवारी रात्री ९ वाजेपासून ११ वाजेपर्यंत पाऊस होता. शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत होते.