शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

सरकारविरोधी आक्रोश मतपेटीपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: January 28, 2017 00:51 IST

लातूर : केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराला समाजातील सर्वच घटक वैतागले आहेत.

लातूर : केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराला समाजातील सर्वच घटक वैतागले आहेत. शेतकरी आणि शेतमजूर कंटाळून संघर्षाच्या पवित्र्यात आले आहेत़ या सर्वांचा आक्रोश एकत्र करून युती सरकारला घालविण्याचा निर्धार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून करावा, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले़ तर अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले, ‘पालकमंत्र्यांची काळजी करू नका, त्यांना मी निलंग्यातच अडवून ठेवतो, त्यांचा वकूब जिल्ह्याच्या नेतृत्वाचा नाही. त्यामुळे लातूरकरांनी पालकमंत्र्यांची काळजी करण्याचे कारण नाही.जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ यावेळी आ़ अमित देशमुख, आ़त्रिंबक भिसे, जि़ प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, माजी आ़ शिवाजीराव पाटील, वैजनाथ शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, शैलेश पाटील चाकूरकर, धीरज देशमुख, दीपशिखा देशमुख, श्रीपतराव काकडे, अ‍ॅड.व्यंकट बेद्रे, सुनीता आरळीकर यांची उपस्थिती होती.यावेळी आ़ दिलीपराव म्हणाले, काही संधीसाधू लोकांनी पक्षांतर केले असले तरीही गोंधळून जाण्याचे कारण नाही. जे गेले ते आपले कधीच नव्हते, त्यांच्या जाण्याने पक्ष अधिक स्वच्छ झाला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना कर्तृत्व दाखविण्याची नामी संधी या निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे. मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले सरकार अनेक पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. नोटबंदी हा तर सरकारचा रिकामटेकडा उद्योग आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. आठवडी बाजार, बैल बाजार चलन तुटवड्याने बंद पडले आहेत. शेतीमालाला भाव नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)