शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधी आक्रोश मतपेटीपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: January 28, 2017 00:51 IST

लातूर : केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराला समाजातील सर्वच घटक वैतागले आहेत.

लातूर : केंद्र व राज्यातील सरकारच्या कारभाराला समाजातील सर्वच घटक वैतागले आहेत. शेतकरी आणि शेतमजूर कंटाळून संघर्षाच्या पवित्र्यात आले आहेत़ या सर्वांचा आक्रोश एकत्र करून युती सरकारला घालविण्याचा निर्धार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून करावा, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले़ तर अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले, ‘पालकमंत्र्यांची काळजी करू नका, त्यांना मी निलंग्यातच अडवून ठेवतो, त्यांचा वकूब जिल्ह्याच्या नेतृत्वाचा नाही. त्यामुळे लातूरकरांनी पालकमंत्र्यांची काळजी करण्याचे कारण नाही.जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजित पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ यावेळी आ़ अमित देशमुख, आ़त्रिंबक भिसे, जि़ प़ अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, माजी आ़ शिवाजीराव पाटील, वैजनाथ शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, शैलेश पाटील चाकूरकर, धीरज देशमुख, दीपशिखा देशमुख, श्रीपतराव काकडे, अ‍ॅड.व्यंकट बेद्रे, सुनीता आरळीकर यांची उपस्थिती होती.यावेळी आ़ दिलीपराव म्हणाले, काही संधीसाधू लोकांनी पक्षांतर केले असले तरीही गोंधळून जाण्याचे कारण नाही. जे गेले ते आपले कधीच नव्हते, त्यांच्या जाण्याने पक्ष अधिक स्वच्छ झाला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना कर्तृत्व दाखविण्याची नामी संधी या निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे. मोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले सरकार अनेक पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. नोटबंदी हा तर सरकारचा रिकामटेकडा उद्योग आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. आठवडी बाजार, बैल बाजार चलन तुटवड्याने बंद पडले आहेत. शेतीमालाला भाव नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)