शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

मांजरा नदीचे अस्तित्व धोक्यात!

By admin | Updated: June 12, 2014 01:37 IST

रमेश कोतवाल , देवणी तालुक्यातील मांजरा नदीतील अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने मांजरा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

रमेश कोतवाल , देवणीतालुक्यातील मांजरा नदीतील अवैध वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने मांजरा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बारा गावांतून मांजरा नदी वाहते. यापैकी निम्म्या गावाला एका बाजूस महाराष्ट्र तर दुसऱ्या बाजूस कर्नाटक राज्याची सीमा आहे. बारा गावांपैकी बटणपूर, विजयनगर, लासोना, सिंधीकामठ, जवळगा, माटेगडी व टाकळी, धनेगाव या गावांतील वाळूचे साठे हे अधिकृतपणे शासनाने लिलाव केले आहेत. तर इतर बाकीच्या गावांमध्ये हे साठे अनधिकृत आहेत. या गावच्या नदीपात्रातील वाळू किती ब्रास काढायची व मूळ नदीपात्र अबाधित राहील, या अटीवर छोट्या मशीनने व मनुष्यबळाने मर्यादित वाळूसाठा उपसा करण्याचा लेखी करार करून सवाल सोडण्यात आले असतानाही या वाळूसम्राटांनी अवैध मार्गाने सर्व नियम बाजूला सारून मोठ मोठ्या मशीनने व यांत्रिकी बोटीच्या साह्याने लाखो ब्रास वाळूचा उपसा केला आहे. हा उपसा दिवस-रात्र सुरू आहे. अवजड यंत्राने व बोटीने नदीपात्रात मोठे खोदकाम करून वाळू उपसा केल्याने बटनपूर, लासोना, विजयनगर, सिंधीकामठ या गावाला तर नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी, नदीपात्र नामपात्र राहिले आहे. बटनपूर, विजयनगर, लासोना, सिंधीकामठ येथे एक उच्चस्तरीय बंधारा आहे. मात्र या वाळूमाफियांनी या बंधाऱ्यातील पाणी, वाळू उपसा करण्यासाठी दोन महिन्याअगोदरच दारे खुले करून सोडून दिले आहेत. त्यामुळे या भागातील जवळपास २ हजार एकर उसावर पाण्याचा मोठा परिणाम झाला आहे. कर्नाटक सरकारची हद्द या गावाच्या दुसऱ्या बाजूला येते. त्या बाजूने कर्नाटक सरकार व वाळूमाफियांनी मिळून आपल्या हक्कासह महाराष्ट्राच्या हद्दीतील वाळूही मोठ्या प्रमाणात उपसली आहे. या दोन राज्यांच्या सीमावादात चार गावच्या हद्दीतील मांजरा नदी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. बीदरच्या पाणीपुरवठ्यासाठी नारंजा प्रकल्पातून कर्नाटक सरकारने पाणी सोडल्याने या चार गावांतील उसाला जीवदान मिळाले आहे. मात्र आजही रात्रं-दिवस वाळूउपसा चालूच आहे. दोन राज्यात मिळून दररोज हजार-दीड हजार ब्रास वाळूूउपसा केला जात आहे. या चार गावानंतर धनेगाव, जवळगा, माटेगडी, टाकळी आदी गावांच्या नदीपात्रातून अवजड यंत्र व बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा चालू आहे. परिणामी, या ठिकाणच्या मांजरा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याबाबत तहसीलदार अहिल्या गाठाळ म्हणाल्या, तालुक्यात अवैैध वाळू उपसा जिथे चालू आहे, तिथे कारवाई करण्यात येईल़तालुक्यात वाळूउपसा मोठ्या प्रमाणात होत असतानादेखील प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. एखाद्यावेळेस झालीच तर कारवाई नाही तर हजार-दोन हजार रुपये दंडापर्यंतची कारवाई करून पुन्हा त्या व्यवसायाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मांजरा नदी व्यतिरिक्त देव नदी, मानमोडी नदीत पण कमी-अधिक प्रमाणात अवैध वाळूउपसा केला जात आहे. परवानगी मर्यादित जणांना, उपसा मात्र मोठ्या संख्येने केला जात आहे.४सध्या देवणी तालुक्यातील विजयनगर, बटनपूर, लासोना, बोरोळ, सिंधीकामठ, धनेगाव, जवळगा, टाकळी, हेळंब आदी बारा गावांमध्ये वाळूमाफियांनी हजारो ब्रासचे ढिग गोळा करून अवैध मार्गाने साठवून पावसाळा व हिवाळ्यात जास्तीच्या किंमतीने विक्री केले जातात. असे अवैध वाळूचे साठे तालुका प्रशासनाला कसे दिसत नाही. वाळू उपशाची लेखी परवानगी घेणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. परंतु, वाळूउपसा करून ढिग लावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे देवणी तालुक्यातील अनेक गावांत असलेले अवैध वाळूसाठे जप्त करून शासनाच्या महसुलीत वाढ करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.