शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

तरुणांनो व्यायाम करा, पोषक आहाराचे सेवन करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:51 IST

धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करणे, पालेभाज्या व हेल्दी फूड खाण्यास प्राधान्य देणे, व्यायाम व योगासन आदींसाठी तरुणांनी सजग व आग्रही राहायला हवे, असे मत प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रामेश्वर सानप (डीएम कॉर्डिओलॉजी) यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाली, पोषक आहाराचा अभाव या समस्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करणे, पालेभाज्या व हेल्दी फूड खाण्यास प्राधान्य देणे, व्यायाम व योगासन आदींसाठी तरुणांनी सजग व आग्रही राहायला हवे, असे मत प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रामेश्वर सानप (डीएम कॉर्डिओलॉजी) यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.डॉ. सानप म्हणाले की, वाढते ताणतणाव, धकाधकीचे जीवन हृदयरोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कमी वयात हा आजार उद्भवत आहेत. या आजारापासून मृत्यू पावणाºयांची संख्या देशात सर्वाधिक आहे. युरोपपेक्षा दहा वर्षे अगोदर भारतीय लोकांना हा आजार होत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. काही वर्षांपर्यंत संसर्गजन्य आजाराने मृत्यू होणाºयांची संख्या अधिक असायची. पण अलीकडच्या काळात हृदयरोग व इतर प्रकारचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागात हृदयरोग रुग्णांची संख्या सारखीच आहे. भारतात दरवर्षी सुमारे १७.१ दशलक्ष लोकांचा मृत्यू हृदयरोगामुळे होत आहे. म्हणजेच कर्करोग, मलेरिया अथवा एचआयव्हीची लागण होऊन मृत्यू पावणाºयांपेक्षा ही संख्या अधिक असल्याचे वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या पाहणीत आढळून आले आहे.हृदयरोग आणि विकारांबाबत जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड हार्ट फेडरेशन दरवर्षी एक थीम घेऊन लोकांमध्ये जाते. यावर्षी ‘टेक अ‍ॅक्शन’ ही थीम घेण्यात आहे. या थीमनुसार आता कृती करण्याची वेळ आली असून, हृदयरोग आणि विकार दूर ठेवण्यासाठी लोकांनी व्यायाम व पोषक आहाराचे सेवन करण्यास प्राधान्य देण्याबाबत जनजागृती करण्यात येईल, असे डॉ. सानप म्हणाले. गरजेपेक्षा अधिक खाणे, व्यायामाचा अभाव, जंकफूड खाणे, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल ही प्रमुख कारणे हृदयरोग वा विकार उदभवण्याची आहेत. ‘फ्युएल युवर हार्ट, मूव्ह यूवर हार्ट, लव्ह युवर हार्ट अ‍ॅण्ड शेअर दि पॉवर’ या उक्तीनुसार तरुणांसह वृद्धांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर या रोगामुळे मृत्यू पावणाºयांची संख्या निश्चितच कमी होईल, यात शंका नाही, असेही सानप यांनी सांगितले. हार्ट अटॅक व इतर हृदयरोगामुळे भारतात मरण पावणाºया संख्या एक लाख लोकसंख्येमागे २७२ आहे. तर तीच जागतिक स्तरावर २३५ इतकी आहे. याचाच अर्थ भारतात या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत असून, ही धोक्याची घंटा आहे. वेळीच सावरले नाही तर तरुणाचे भवितव्य अंधारात जाईल. म्हणूनच हृदय रोग होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाय करणे अगत्याचे ठरणार असल्याचे सानप म्हणाले.