शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

तरुणांनो व्यायाम करा, पोषक आहाराचे सेवन करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:51 IST

धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करणे, पालेभाज्या व हेल्दी फूड खाण्यास प्राधान्य देणे, व्यायाम व योगासन आदींसाठी तरुणांनी सजग व आग्रही राहायला हवे, असे मत प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रामेश्वर सानप (डीएम कॉर्डिओलॉजी) यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाली, पोषक आहाराचा अभाव या समस्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करणे, पालेभाज्या व हेल्दी फूड खाण्यास प्राधान्य देणे, व्यायाम व योगासन आदींसाठी तरुणांनी सजग व आग्रही राहायला हवे, असे मत प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रामेश्वर सानप (डीएम कॉर्डिओलॉजी) यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.डॉ. सानप म्हणाले की, वाढते ताणतणाव, धकाधकीचे जीवन हृदयरोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. कमी वयात हा आजार उद्भवत आहेत. या आजारापासून मृत्यू पावणाºयांची संख्या देशात सर्वाधिक आहे. युरोपपेक्षा दहा वर्षे अगोदर भारतीय लोकांना हा आजार होत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. काही वर्षांपर्यंत संसर्गजन्य आजाराने मृत्यू होणाºयांची संख्या अधिक असायची. पण अलीकडच्या काळात हृदयरोग व इतर प्रकारचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. विशेष म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागात हृदयरोग रुग्णांची संख्या सारखीच आहे. भारतात दरवर्षी सुमारे १७.१ दशलक्ष लोकांचा मृत्यू हृदयरोगामुळे होत आहे. म्हणजेच कर्करोग, मलेरिया अथवा एचआयव्हीची लागण होऊन मृत्यू पावणाºयांपेक्षा ही संख्या अधिक असल्याचे वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या पाहणीत आढळून आले आहे.हृदयरोग आणि विकारांबाबत जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड हार्ट फेडरेशन दरवर्षी एक थीम घेऊन लोकांमध्ये जाते. यावर्षी ‘टेक अ‍ॅक्शन’ ही थीम घेण्यात आहे. या थीमनुसार आता कृती करण्याची वेळ आली असून, हृदयरोग आणि विकार दूर ठेवण्यासाठी लोकांनी व्यायाम व पोषक आहाराचे सेवन करण्यास प्राधान्य देण्याबाबत जनजागृती करण्यात येईल, असे डॉ. सानप म्हणाले. गरजेपेक्षा अधिक खाणे, व्यायामाचा अभाव, जंकफूड खाणे, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल ही प्रमुख कारणे हृदयरोग वा विकार उदभवण्याची आहेत. ‘फ्युएल युवर हार्ट, मूव्ह यूवर हार्ट, लव्ह युवर हार्ट अ‍ॅण्ड शेअर दि पॉवर’ या उक्तीनुसार तरुणांसह वृद्धांनी हृदय निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर या रोगामुळे मृत्यू पावणाºयांची संख्या निश्चितच कमी होईल, यात शंका नाही, असेही सानप यांनी सांगितले. हार्ट अटॅक व इतर हृदयरोगामुळे भारतात मरण पावणाºया संख्या एक लाख लोकसंख्येमागे २७२ आहे. तर तीच जागतिक स्तरावर २३५ इतकी आहे. याचाच अर्थ भारतात या आजाराचे रुग्ण वेगाने वाढत असून, ही धोक्याची घंटा आहे. वेळीच सावरले नाही तर तरुणाचे भवितव्य अंधारात जाईल. म्हणूनच हृदय रोग होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाय करणे अगत्याचे ठरणार असल्याचे सानप म्हणाले.