शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

दहावी-बारावीला नेमका अभ्यासक्रम किती, परीक्षा कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:05 IST

--- औरंगाबाद ः दहावी बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली. मात्र, नेमकी परीक्षा कधी होणार, किती अभ्यासक्रम असणार यासंबंधी ...

---

औरंगाबाद ः दहावी बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली. मात्र, नेमकी परीक्षा कधी होणार, किती अभ्यासक्रम असणार यासंबंधी प्रशासनाकडून निश्चित उत्तरे मिळत नसल्याने विद्यार्थी पालकांत संभ्रमावस्था कायम आहे. तर दुसरीकडे बोर्डाकडून प्रश्नसंच निश्चितीचे काम १०० टक्के अभ्यासक्रमावर सुरु झाले आहे. त्यामुळे नेमका अभ्यासक्रम किती व कोणता असा सवाल विद्यार्थी, पालक शिक्षकांतून उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. तिथे विद्यार्थी ५० टक्केही विद्यार्थी नियमित शाळांत उपस्थित होत नसल्याचे चित्र आहे. तर शहरात गेल्या आठवड्यापासून अकरावी व बारावीचे वर्ग सुरु झाले. मात्र, विद्यार्थी संख्या १५ टक्क्यांवर गेली नाही. आतापर्यंत जे शिकले ते आनलाईन त्यात विद्यार्थ्यांना अवगत किती झाले हा संशोधनाचा विषय असला तरी प्रत्यक्ष वर्ग सुरु झाल्यावर तरी ही संभ्रमावस्था दूर होऊन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किती आहे. कपात झाल्यास तो कोणता आहे. याबद्दलची कल्पना देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनात सर्वच जन शासनाकडे व वरिष्ठांकडे बोट दाखवत आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात येते. विभागातून दीड ते दोन लाख विद्यार्थी परीक्षा देतात. अद्याप प्रत्यक्ष वर्गच सुरु न झाल्याने एप्रिलच्या शेवट किंवा मे महिन्यात परीक्षेचा निर्णय होईल असे शिक्षणमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तसेच शैक्षणिक वर्ष केव्हापासून गृहित धरायचे हे देखील स्पष्ट नाही. त्याचा पेच आधी सुटल्यास त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करता येईल असे शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

--

प्रश्नसंचनिर्मितीचे काम

१०० टक्के अभ्यासक्रमावर सुरु

---

दहावी बारावीच्या प्रश्नसंच निर्मितीचे काम सुरु झाले आहे. सध्याचे काम १०० टक्के अभ्यासक्रमावर सुरु असून अंतिम निर्णय राज्य मंडळ घेईल. अभ्यासक्रम कपातीबद्दल अद्याप सूचना नाही. राज्य मंडळ व शासनाच्या निर्णयानंतर पुढील सूचनांनुसार प्रश्नपत्रिका अंतिम होईल. परीक्षांबाबत अद्याप कोणत्याही सूचना नाहीत.

-सुगता पुन्ने, विभागीय प्रभारी अध्यक्ष व सचिव, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ