शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

अखेर ब्रम्हगव्हाण योजना चितळे समितीच्या कचाट्यातून सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:05 IST

औरंगाबाद : पैठण तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना (टप्पा क्र. २) ही योजना चितळे समितीच्या कचाट्यातून ...

औरंगाबाद : पैठण तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना (टप्पा क्र. २) ही योजना चितळे समितीच्या कचाट्यातून सुटली आहे. राज्य सरकारने योजना दोषमुक्त असल्याचे जाहीर केल्याने अंदाजे एक हजार कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे. चितळे समितीने योजनेबाबत काढलेल्या त्रुटींची पूर्तता जलसंपदा विभागाकडून केली जाणार आहे.

सिंचन प्रकल्पांबाबत विशेष चौकशी करणाऱ्या माधवराव चितळे समितीने राज्यातील १६ प्रकल्पांत अनियमितता झाल्याचे ताशेरे ओढल्याने ते सर्व प्रकल्प दोषयुक्त ठरविले होते. त्यात ब्रम्हगव्हाण योजनेचाही समावेश होता. योजनेशी संबंधितांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे इतर १५ योजना दोषमुक्त झाल्या; परंतु ब्रह्मगव्हाण सिंचन योजना सहा वर्षांपासून समितीने ओढलेल्या ताशेऱ्यांच्या कचाट्यातून सुटत नव्हती.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, उपअभियंता जयंत गायकवाड, आदींनी राज्य पातळीवरील तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठपुरावा केल्यामुळे योजना दोषमुक्त झाल्याचे सरकारने गुरुवारी महामंडळाला एका पत्रान्वये कळविले.

आता योजनेला गती मिळणार

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील खेर्डा लघु तलावापर्यंत कालवा वितरिकांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत. प्रकल्पासाठीच्या पीक रचनेला कृषी आयुक्तांची मंजुरी घेतली जाणार आहे. महाराष्ट्र जलसपंत्ती नियमन प्राधिकरण, पर्यावरण, केंद्रीय जल आयोगाच्या मान्यता मिळाल्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून प्रकल्पास गती येईल, अशी अपेक्षा लघुपाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी व्यक्त केली.