शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

१८ वर्षांपासून नोकरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शासकीय आणि निमशासकीय आस्थापनेवरील वर्ग-३ आणि ४ च्या मंजूर रिक्त पदांवर करार तत्त्वावर नेेमणुका मिळाव्यात, यासाठी राज्यातील ...

औरंगाबाद : शासकीय आणि निमशासकीय आस्थापनेवरील वर्ग-३ आणि ४ च्या मंजूर रिक्त पदांवर करार तत्त्वावर नेेमणुका मिळाव्यात, यासाठी राज्यातील १८ हजार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा १८ वर्षांपासून (२००३ पासून) विविध मार्गांनी पाठपुरावा चालू आहे; मात्र त्याला अद्याप यश आले नाही. म्हणून मराठवाड्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी अखेर औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.

काय आहे याचिका

महाराष्ट्र शासनाने १९९५ ते २००३ दरम्यान पदवीधर अंशकालीन उमेदवारांना शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांवर करार तत्त्वावर नेमणुका देऊन ३ वर्षांपर्यंत काम करून घेतले; मात्र २००३ पासून त्यांना कुठल्याही शासकीय किंवा निमशासकीय आस्थापनांवर करार तत्त्वावर नेमणुका दिल्या नाहीत. या उमेदवारांनी तेव्हापासून धरणे, आंदोलने, मोर्चे, उपोषणे आदी मार्गाने शासनाकडे पाठपुरावा चालू आहे.

शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणीच नाही

राज्य शासनाने पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी ३० ऑक्टोबर २०१६, २ मार्च २०१९, ३० सप्टेंबर २०२०, २२ फेब्रुवारी २०२१ रोजी कौशल्य विकास, उद्योजक विभाग, वित्त विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने शासकीय परिपत्रके काढली, संबंधिताना मार्गदर्शक सूचना जारी केल्या, तसेच सरळसेवा भरतीमध्ये १० टक्के समांतर आरक्षण जाहीर केले.

परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून मराठवाड्यातील छाया युवराज सोनवणे व इतर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी ॲड. अंगद एल. कानडे (भाटसांगवीकर) यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका सादर केली आहे. शासकीय परिपत्रकांची अंमलबजावणी करावी, तसेच शासकीय आणि निमशासकीय आस्थापनेवरील वर्ग-३ आणि ४ च्या मंजूर रिक्त पदांवर करार तत्त्वावर नेेमणुका द्याव्यात, अशी विनंती त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.