शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

परभणीत ३६ पथकांची स्थापना

By admin | Updated: September 13, 2014 00:11 IST

परभणी: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

परभणी: विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवारी सायंकाळपासून राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू झाली असून, प्रशासनाने ३६ आचारसंहितेवर वॉच ठेवण्यासाठी ३६ पथके स्थापन केली आहेत.आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी प्रशासनाच्या तयारीसंदर्भात माहिती दिली. जिल्ह्यात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून, प्रशासन सज्ज झाले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेच जिल्ह्यात ३६ पथके कार्यरत केले आहेत. जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ असून, प्रत्येक मतदार संघात तीन या प्रमाणे १२ भरारी पथके कार्यरत झाले आहेत. त्याचप्रमाणे आचारसंहितेची प्रत्येकी ३ अशी बारा आणि १२ संनियंत्रण पथके कार्यरत करण्यात आली आहेत. एक उपविभागीय अधिकारी, एक पोलिस अधिकारी, दोन पोलिस कर्मचारी आणि एक व्हिडीओग्राफर या पथकामध्ये राहणार आहे. त्याचप्रमाणे चौदा नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी दिली आहे. निवडणूक काळात पैश्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता, या निवडणुकीत देखील प्रत्येक नाक्यावर तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक मतदारांना व्होटर स्लिप देण्याचे प्रयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, सहायक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.