शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

महासत्तेपेक्षाही समतेची गरज

By admin | Updated: April 13, 2016 00:49 IST

औरंगाबाद : महासत्तेपेक्षा देशात समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, तरच पुरोगामी प्रगत विचारांच्या महापुरुषांना खरेखुरे अभिवादन ठरेल,

औरंगाबाद : महासत्तेपेक्षा देशात समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, तरच पुरोगामी प्रगत विचारांच्या महापुरुषांना खरेखुरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती उत्सव समारंभात ते बोलत होते. यावेळी भारतीय विधि आयोगाचे माजी सदस्य प्रा. डी. एन. संदानशिव, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी संयोजक डॉ. सुहास मोराळे, डॉ. उत्तम अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्यगृहात मंगळवारी (दि.१२) हा कार्यक्रम झाला. यावेळी शाहू महाराज म्हणाले, भारताचा पाच हजार वर्षांचा इतिहास मांडण्यात आलेला आहे. १८ व्या शतकापर्यंत सामाजिक इतिहास सांगितला गेला नाही. प्रा. संदानशिव यांचे ‘राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झाले. समता, बंधुता व न्याय ही त्रिसूत्री भारतीय राज्यघटनेमुळे मिळाली. या वैचारिक मूल्यांची बीजे फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीत आहेत. भारतात आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारा पहिला राजा म्हणून सयाजीराव गायकवाड यांची नोंद आहे. या राजाचा इतिहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवण्यात आला, असे बाबा भांड म्हणाले. दरवर्षी फुले-आंबेडकर जयंती महोत्सव घेण्यात येईल, असे डॉ.चोपडे यांनी घोषित केले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन, डॉ. उत्तम अंभोरे यांनी आभार मानले. नलिनी चोपडे, डॉ. राजेश करपे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, भन्ते आनंदजी, डॉ. अरुण खरात, डॉ. धनंजय माने, डॉ. कैलास पाथ्रीकर यांची उपस्थिती होती.