शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
4
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
5
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
6
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
7
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
9
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
10
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
11
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
12
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
13
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
14
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
15
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
16
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
17
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
18
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
19
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
20
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

महासत्तेपेक्षाही समतेची गरज

By admin | Updated: April 13, 2016 00:49 IST

औरंगाबाद : महासत्तेपेक्षा देशात समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, तरच पुरोगामी प्रगत विचारांच्या महापुरुषांना खरेखुरे अभिवादन ठरेल,

औरंगाबाद : महासत्तेपेक्षा देशात समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, तरच पुरोगामी प्रगत विचारांच्या महापुरुषांना खरेखुरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती उत्सव समारंभात ते बोलत होते. यावेळी भारतीय विधि आयोगाचे माजी सदस्य प्रा. डी. एन. संदानशिव, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी संयोजक डॉ. सुहास मोराळे, डॉ. उत्तम अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. नाट्यगृहात मंगळवारी (दि.१२) हा कार्यक्रम झाला. यावेळी शाहू महाराज म्हणाले, भारताचा पाच हजार वर्षांचा इतिहास मांडण्यात आलेला आहे. १८ व्या शतकापर्यंत सामाजिक इतिहास सांगितला गेला नाही. प्रा. संदानशिव यांचे ‘राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झाले. समता, बंधुता व न्याय ही त्रिसूत्री भारतीय राज्यघटनेमुळे मिळाली. या वैचारिक मूल्यांची बीजे फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीत आहेत. भारतात आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारा पहिला राजा म्हणून सयाजीराव गायकवाड यांची नोंद आहे. या राजाचा इतिहास जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवण्यात आला, असे बाबा भांड म्हणाले. दरवर्षी फुले-आंबेडकर जयंती महोत्सव घेण्यात येईल, असे डॉ.चोपडे यांनी घोषित केले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी सूत्रसंचालन, डॉ. उत्तम अंभोरे यांनी आभार मानले. नलिनी चोपडे, डॉ. राजेश करपे, डॉ. सर्जेराव ठोंबरे, भन्ते आनंदजी, डॉ. अरुण खरात, डॉ. धनंजय माने, डॉ. कैलास पाथ्रीकर यांची उपस्थिती होती.