शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठाचा लौकिक वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाते. त्यामुळे ज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून जगात या ...

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाते. त्यामुळे ज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून जगात या विद्यापीठाचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने आयोजित २७ व्या नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त ‘शैक्षणिक क्षेत्रातील मागासवर्गीयांची गुणवत्तावाढ आणि आर्थिक सक्षमीकरण’, या विषयावर डॉ. प्रशांत नारनवरे यांचे विशेष व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले होते. डॉ. नारनवरे म्हणाले, ‘पूर्वी ज्ञान घेणे किंवा ते संपादन करणे हा गुन्हा होता. आता सर्वांना शिक्षण घेणे हा अधिकार संविधानाने दिला आहे. माणूस शिक्षित झाल्यावर सुसंस्कृत होतो. शिक्षित लोकांनी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहोचविण्याचे काम करण्याची गरज आहे. विद्यापीठाने नवोपक्रमाची कास धरली पाहिजे. सॉफ्ट स्कील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यावर अधिक काम केले पाहिजे. समांतर संस्था निर्माण केल्या तरच आर्थिक सक्षमीकरणांकडे आपली वाटचाल होईल. सत्तर वर्षात वंचित घटकांतील अनेक जणांनी आपल्या कार्यकर्तृवाचा झेंडा सातासमुद्रापार नेला, ही आनंदाची बाब आहे.’

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ‘मोठ्या संघर्षानंतर विद्यापीठाचा नामविस्तार झाला. नामांतर ही लढाई एका अर्थाने समतेचा संगर आहे. नामांतराच्या लढाईत अनेकांनी बलिदान दिले, याची जाणीव सर्वांनी ठेवावी. आज गुणात्मकदृष्ट्या आपण कोठे आहोत. आपणांस विद्यापीठाने काय दिले, यापेक्षा आपण विद्यापीठाला काय दिले, याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.’

प्रारंभी प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उत्तम अंभोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन, तर कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आभार मानले. कोरोनाच्या नियमांचे पालन करून या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद तसेच अधिसभा सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.