शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

संशोधनाच्या माध्यमातून विद्यापीठाचा लौकिक वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाते. त्यामुळे ज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून जगात या ...

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाते. त्यामुळे ज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून जगात या विद्यापीठाचा लौकिक वाढविण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने आयोजित २७ व्या नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त ‘शैक्षणिक क्षेत्रातील मागासवर्गीयांची गुणवत्तावाढ आणि आर्थिक सक्षमीकरण’, या विषयावर डॉ. प्रशांत नारनवरे यांचे विशेष व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले होते. डॉ. नारनवरे म्हणाले, ‘पूर्वी ज्ञान घेणे किंवा ते संपादन करणे हा गुन्हा होता. आता सर्वांना शिक्षण घेणे हा अधिकार संविधानाने दिला आहे. माणूस शिक्षित झाल्यावर सुसंस्कृत होतो. शिक्षित लोकांनी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहोचविण्याचे काम करण्याची गरज आहे. विद्यापीठाने नवोपक्रमाची कास धरली पाहिजे. सॉफ्ट स्कील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यावर अधिक काम केले पाहिजे. समांतर संस्था निर्माण केल्या तरच आर्थिक सक्षमीकरणांकडे आपली वाटचाल होईल. सत्तर वर्षात वंचित घटकांतील अनेक जणांनी आपल्या कार्यकर्तृवाचा झेंडा सातासमुद्रापार नेला, ही आनंदाची बाब आहे.’

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ‘मोठ्या संघर्षानंतर विद्यापीठाचा नामविस्तार झाला. नामांतर ही लढाई एका अर्थाने समतेचा संगर आहे. नामांतराच्या लढाईत अनेकांनी बलिदान दिले, याची जाणीव सर्वांनी ठेवावी. आज गुणात्मकदृष्ट्या आपण कोठे आहोत. आपणांस विद्यापीठाने काय दिले, यापेक्षा आपण विद्यापीठाला काय दिले, याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे.’

प्रारंभी प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उत्तम अंभोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन, तर कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी आभार मानले. कोरोनाच्या नियमांचे पालन करून या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद तसेच अधिसभा सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.