शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शहरात लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Updated: September 21, 2016 00:22 IST

औरंगाबाद : मनपाच्या खुल्या जागांवर भूखंडमाफिया अतिक्रमणे करीत आहेत. अनेक रस्ते, चौकांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत.

 

औरंगाबाद : मनपाच्या खुल्या जागांवर भूखंडमाफिया अतिक्रमणे करीत आहेत. अनेक रस्ते, चौकांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लवकरच एक महिना सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. शहरातील अतिक्रमणांचा विषय मनपात बराच गाजत आहे. प्रत्येक सर्वसाधारण सभेत नगरसेवक आपल्या वॉर्डातील अतिक्रमणांवरून ओरड करीत असतात. आज पुन्हा एकदा अतिक्रमणांच्या विषयावर तासभर चर्चा झाली. नगरसेवक कैलास गायकवाड यांनी पार्किंगच्या जागांचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनीही बरीच ओरड केली. राज वानखेडे यांनी अतिक्रमण विभाग ठेवताच कशाला असा प्रश्न केला. अफसर खान, अब्दुल नाईकवाडी यांनीदेखील आपल्या वॉर्डातील अतिक्रमणांचे विषय मांडले. सीमा चक्रनारायण यांनी सूतगिरणी रोडवरच्या अतिक्रमणांवर कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा केली. स्वाती नागरे यांनी रस्त्यावरच खडी, वाळूसह बांधकाम साहित्याच्या ट्रॅक्टरचे अतिक्रमण असते. अनेक भाजीपाला विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसतात, अशी तक्रार केली. त्यावर आयुक्तांनी वरील आश्वासन दिले. शिक्षण विभागाचा आढावा घेणार मनपा शिक्षण विभागाचा आढावा घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पात्र शिक्षक आहेत का असा प्रश्न कैलास गायकवाड यांनी केला होता. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिक्षण विभागाबाबत प्रश्नांचा भडिमार केला. सीमा खरात, राज वानखेडे, आत्माराम पवार, विरोधीपक्षनेता अयुब जागीरदार, संगीता सानप, सुमित्रा हाळनोर यांनीही चर्चेत भाग घेतला.