शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
5
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
6
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
7
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
8
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
9
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
10
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
11
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
12
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
13
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
14
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
15
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
16
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
17
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
18
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

कर्मचाऱ्यांचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन

By admin | Updated: July 16, 2016 01:12 IST

उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लेखणी बंद आंदोलनाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.

उस्मानाबाद : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लेखणी बंद आंदोलनाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये जिल्हा तसेच तालुकास्तरीय कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे.लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनेच्या वतीने बेमुदत लेखणी बंद आंदोलन शुक्रवारपासून सुरू केले आहे. सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यकांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करावी, लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रशासकी व विनंती बदल्यांबाबतचे अन्यायकारक धोरण रद्द करण्यात यावे, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा जॉबचार्ट, कर्तव्यसूची निश्चित करावी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्याप्रमाणेच लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सर्वस्तरीय नि:शुल्क सवलत मिळावी, वाहनचालकांप्रमाणे अतिरिक्त भत्ता मिळावा, पदोन्नतीधारकास वरिष्ठ पदाचे किमान मूळवेतन मिळण्यासाठी २२ एप्रिल २००९ रोजीच्या अधिसूचनेत सुधारणा करण्यात यावी, जिल्हा निवड समितीद्वारे किंवा ‘एमपीएससी’द्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी लिपिकांना ४५ वर्ष वयोमर्यादेपर्यंत परीक्षेला बसण्याची सवलत मिळावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. कार्यालय सुरू झाल्यापासूनच कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले. दुपारी १ वाजेपर्यंत कर्मचारी कुठलेही काम न करता कर्मचारी आपपाल्या जागेवर बसून होते. दुपारनंतर तर बहुतांश कार्यालयामध्ये रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन झाले. जोपर्यंत शासन न्याय मागण्यांचा विचार करणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले जाईल, असा इशारा संघटनेच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष भास्कर कोल्हे, उपाध्यक्ष राहुल माने, सचिव ऋषिकेश पिंगळे यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)