शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

थकित वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा बंद

By admin | Updated: January 13, 2015 00:13 IST

लातूर : थकित वेतनासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन केले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतही कर्मचाऱ्यांचा ठिय्या मनपात होता.

लातूर : थकित वेतनासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी अचानक काम बंद आंदोलन केले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंतही कर्मचाऱ्यांचा ठिय्या मनपात होता. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी मनपाचे दार बंद करून घोषणाबाजी करीत आंदोलन केले. सायंकाळी आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकित आहे. तर इतर विभागांतील कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्यांपासून थकित असल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करुन थकित वेतन तात्काळ देण्याची मागणी केली. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सफाई कर्मचाऱ्यांनी जवळपास दोन ते अडीच तास ठिय्या मांडला. महापालिकेत असलेल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ३५० कर्मचारी सफाई विभागात कार्यरत आहेत. मागील तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने उपासमारीची वेळ आली आहे. चौथा महिना सुरू झाला तरी अद्यापही वेतन मिळाले नसल्याने गैरसोय होत असल्याची ओरड कर्मचाऱ्यांनी केली. वेतन वेळेवर मिळत नाही. शिवाय, मनपा प्रशासनाने वेतनातून कपात करून घेतलेले बँकांचे हप्ते, एलआयसीचे हप्ते वेळेत न भरल्यामुळे बँकांच्या नोटिसा कर्मचाऱ्यांना मिळत आहेत. जोपर्यंत मनपा प्रशासन थकित वेतन देणार नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मराठवाडा श्रमिक संघटनेचे अध्यक्ष रामदास शिंदे यांनी मांडली.सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अद्याप अनेक कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यात बहुतांश सफाई विभागातील कर्मचाऱ्यांचाच समावेश आहे. सोसायटीचे हप्ते दोन वर्षांपासून भरण्यात आले नाहीत. परिणामी, कर्जाचा डोंगर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने कचरा उचलण्यासाठी लावलेले ट्रॅक्टर व काही खाजगी कर्मचारी यांचे वेतन वेळेवर करते. मात्र कर्मचाऱ्यांचे वेतन थकवून त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. आयुक्तांनी महिनाभरापूर्वी वेतन तात्काळ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन त्यांनी पाळले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सफाई विभागात ८३ कर्मचारी रोजंदारीवर आहेत. त्यांचाही पगार थकित आहे. शिवाय, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे विविध आजाराने ग्रासलेल्या पेन्शनधारकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने आजार बळावत चालले आहेत. वारसाला कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र ते पाळले जात नाही. शिवाय, पेन्शनची रक्कम दिली जात नसल्याने उपाशीपोटी जगण्याची वेळ आल्याची ओरडही काही पेन्शनधारकांनी केली. (प्रतिनिधी)मनपा आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, सफाई विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकित आहे. तर इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन दोन महिन्यांपासून थकले आहे. ४शासनाकडून ४ कोटी २५ लाख रुपये दुसऱ्या टप्प्यात अनुदान आले आहे. वेतनाची प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाईल. आंदोलनकर्त्या सफाई कर्मचाऱ्यांना मंगळवारी वेतन देण्यात येईल, असे लेखी आश्वासन आपण दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेतले.