शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

घर खरेदीनंतर इंटिरियरवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:04 IST

औरंगाबाद : फ्लॅट, असो रोहाऊस, बंगला असो तो खरेदी केल्यानंतर लगेच कोणी राहायला जात नाही. घरातील अंतर्गत सजावट, फर्निचर ...

औरंगाबाद : फ्लॅट, असो रोहाऊस, बंगला असो तो खरेदी केल्यानंतर लगेच कोणी राहायला जात नाही. घरातील अंतर्गत सजावट, फर्निचर तयार करून मगच गृहप्रवेश केला जातो. पूर्वी नवीन घर खरेदी केल्यावर पहिले तिथे राहिला जात असत व नंतर सोयीनुसार इंटिरियर केले जात असे. पण आता ‘जमाना बदल गया है भाई’. घर खरेदी करतानाच लोक इंटिरियरसाठी स्वतंत्र बजेट बाजूला काढून ठेवतात. बांधकाम व्यावसायिकांकडून घराचा ताबा घेतल्यावर इंटिरियर डिझाईनर किंवा आर्किटेक्टला बोलविले जाते. त्यांना संपूर्ण फ्लॅट दाखवून त्यांच्याशी चर्चा केली जाते. त्यानंतर आर्किटेक्ट किंवा डिझाईनर घरातील सर्वांची पसंती लक्षात घेतात. त्यांच्या गरजा लक्षात घेतात त्यानंतर फ्लॅटचे माप मोजतो. झालेल्या चर्चेनुसार आराखडा म्हणजेच प्लॅन तयार केला जातो. घरातील फर्निचर अशा पद्धतीने ठेवावे की, रूममधला वावर हा अगदी सोपा व अडथळे विना असावा. चालण्यासाठी योग्य मापाचा पॅसेज (रस्ता) असावा. घरात असलेले सर्व लव्हिंगमध्ये.............. बसू शकतील किमान एवढ सीटिंग आणि डायनिंग असावं. जर जागा अपुरी असेल तर स्मार्ट पद्धतीने स्पेस सेव्हिंग फर्निचरचा उपयोग करावा. आजकालच्या फ्लॅटमध्ये किचनला सर्वात कमी जागा दिली जाते. तेवढ्या जागेत, संपूर्ण किचनचे साहित्य बसविणे म्हणजे कल्पकतेचा कस लागतो. फर्निचरचा आकार आणि रंग ठरवताना भिंती आणि पडदे यांचेही रंगाचा विचार करावा. २ पेक्षा जास्त रंग टाळावेत, एकामेकास कॅम्पलिमेंट करणारे रंग वापरावे. फॉल्स सिलिंगने इंटिरियरचा लूक आकर्षक होतो. तसेच लायटिंगकडे दुर्लक्ष होता कामा नये. कारण, व्यवस्थित वापरलेला लाईट्‌सचा घरातील इंटेरिअर्सचे लूक १०० टक्के सुधारतो. यासह अन्य लहान-मोठ्या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. कारण, घरात राहण्यासाठी गेल्यानंतर इएमआय व अन्य खर्चामुळे पुन्हा इंटिरियरसाठी वेगळे बजेट काढताना दमछाक होते व इंटिरियरचा निर्णय नंतर लांबणीवर पडतो. असा अनेकांचा अनुभव आहे. बजेट असेल तर गृहप्रवेशाआधीच इंटिरियर झाले पाहिजे.