शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

देशात अतिसारामुळे अकरा टक्के बालमृत्यू

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

परभणी : देशात अतिसार व जुलाबामुळे ११ टक्के बालकांचा मृत्यू होतो़ हे प्रमाण साधारणत: उन्हाळा व पावसाळ्यात आहे़

परभणी : देशात अतिसार व जुलाबामुळे ११ टक्के बालकांचा मृत्यू होतो़ हे प्रमाण साधारणत: उन्हाळा व पावसाळ्यात आहे़ कुपोषित मुले व दोन वर्षांखालील मुलांचा यात अधिक समावेश असतो़ त्यामुळे अतिसारापासून बचाव करण्यासाठी शुद्ध पाणी आणि योग्य आहार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांनी केले़ परभणीत जि़ प़ आरोग्य विभागाच्या वतीने ८ आॅगस्टपर्यंत अतिसार नियंत्रण पंधरवाडा साजरा केला जात आहे़ या अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात डुंबरे बोलत होते़ अतिसारामुळे एकही बालमृत्यू होऊ नये, हा पंधरवडा पाळण्यामागचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले़ २८ जूून ते २ आॅगस्ट या काळात अतिसार नियंत्रण कार्यक्रमा संदर्भात योजनांची अंमलबजावणी करण्यात आली़ ४ ते ८ आॅगस्ट या काळात अर्भक व लहान बालके यांच्या आजारासंबंधी जनजागृती केली जाणार आहे़ या मोहिमेत पाच वर्षाखालील बालके, ज्या बालकांना अतिसार आहे आणि कुपोषित आहेत अशा बालकांचे माता, पिता व पालक लाभार्थी असणार आहेत़ गावात गृहभेटी देऊन पाच वर्षाखालील बालकांना ओआरएस पाकिटे व अतिसार प्रतिबंधाविषयी माहिती दिली जाणार आहे़ तसेच कुपोषित मुले ओळखून त्यांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा केली जाणार आहे, अशी माहितीही डुंबरे यांनी दिली़ (प्रतिनिधी)