शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

वृद्ध कलावंतांची फरफट !

By admin | Updated: August 18, 2015 00:52 IST

उस्मानाबाद : वृद्ध कलावंतांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी चारशेवर प्रस्ताव दाखल झाले आहेत.

उस्मानाबाद : वृद्ध कलावंतांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी चारशेवर प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यापैकी पन्नास टक्क्यांच्या आसपास प्रस्ताव परिपूर्ण आहेत. मात्र, ‘नवीन समिती गठीत करेपर्यंत प्रस्तावांना मंजुरी देऊ नये,’ अशा आशयाचे पत्र पालकमंत्र्यांकडून समाजकल्याण विभागाला देण्यात आले आहे. त्यामुळे प्रस्तावांचे गठ्ठे धुळखात पडून आहेत. विशेष म्हणजे दोन महिन्यांचा कालावधी लोटला समिती गठित करण्यात आलेली नाही. त्यामुळे वृद्ध कलावंतांची फरफट सुरूच आहे.कलावंताना वृद्धापकाळात कोणापुढेही हात पसरण्याची गरज भासून नये, यासाठी शासनाच्या वतीने त्यांना अनुदान देण्यात येत आहे. कलावंतांची वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार अनुदानही देण्यात येते. सुरूवातीच्या काळात या योजनेला कलावंतांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, मध्यंतरी शासनाकडून अनुदानामध्ये वाढ करण्यात आली. तेव्हापासून प्रस्तावांची संख्या वाढू लागली आहे. २०१३-१४ या कालावधीत बऱ्यापैकी प्रस्ताव आले होते. छाननीदरम्यान अवघे ६६ प्रस्ताव पात्र ठरले. पात्र ठरलेल्या या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देणे अपेक्षित होते. परंतु, तसे झालेले नाही. अद्यापही हा प्रश्न लटकलेलाच आहे. असे असले तरी २०१३-१४ या आर्थिक वर्षातही मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल झाले होते. छाननीअंती ११५ प्रस्ताव पात्र ठरले. यापैकी एकालाही मंजुरी देण्यात आलेली नाही. प्रस्ताव सादर करूनही मंजुरी मिळत नसल्याने अनेक वृद्ध कलावंत तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवित आहेत. परंतु, त्यांच्याही हातामध्ये काहीच नसल्याने ‘लवकरच मंजुरी मिळेल’ असे आश्वासन देवून परत पाठवित आहेत.वृद्ध कलावंत कार्यालयांचे उंबरठे झिजवित असतानाच पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी साधारणत: दोन महिन्यांपूर्वी समाजकल्याण विभागाल पत्र देवून जुनी समिती रद्द केल्याबाबत कळविले आहे. तसेच नवीन समिती गठित करेपर्यंत कलावंतांचे प्रस्ताव मंजूर करू नयेत, असे त्या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र पस्ताव धूळखात पडून आहेत. विशेष समाजकल्याण विभागाला पत्र मिळून दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. असे असतानाही अद्याप नवीन समिती गठित करण्यात आलेली नाही. त्यामुळे कलावंतांच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पात्र पस्तावांचे गठ्ठे धूळखात पडून आहेत. त्यामुळे कलावंतांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)