शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अठरा महिन्यांत बारा ग्रामसेवक

By admin | Updated: August 20, 2014 01:50 IST

कळंब : ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटातील अस्सल गावठी राजकारणाच्या कथानकाला साजेल, असं राजकीय ‘नाट्य’ सध्या कळंब तालुक्यातील अनेक गावांत घडत आहे.

कळंब : ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटातील अस्सल गावठी राजकारणाच्या कथानकाला साजेल, असं राजकीय ‘नाट्य’ सध्या कळंब तालुक्यातील अनेक गावांत घडत आहे. कधी नेतेगिरीच्या तोऱ्यात तर कधी जातीय स्वरुप देऊन, तर कधी एकमेकांविरुध्द खोट्यानाट्या तक्रारी देऊन राजकीय खुन्नस काढली जात आहे. राजकीय सारिपाटावरील या नव्या खेळीमुळे सर्वसामान्य मात्र बेजार झाल्याचे चित्र आहे. सत्तेच्या साठमारीत गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या खामसवाडीतही हाच प्रकार प्रकर्षाने दिसून येत आहे. दहा हजार लोकसंख्येचे खामसवाडी गाव लोकसंख्येच्या बाबतीत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोठे शिवार, सुपीक जमीन, पारंपरिक सिंचनावर ऊस शेती, यामुळे गावाला आर्थिक सुबत्ता लाभली आहे. यास पुरक म्हणून येथे दुग्ध व्यवसायही जोपासला जात आहे. रोकडेश्वरी देवीचे जागृत देवस्थान असलेले खामसवाडी गाव तेरणा पट्यातील प्रमुख गाव असून राजकारणाचे ते केंद्रबिंदू मानले जाते. हेच राजकारण गावातील वातावरण बिघडविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मागील काही दिवसांतील घडामोडीवरुन दिसून येत आहे. मध्यंतरी राजकारणातील स्थित्यंतरे बदलली, संदर्भ बदलले. बदलानुरुप प्रस्थापितांना शह देण्यासाठी नव तरुणांचे नेतृत्व उदयास आले. आणि संघर्षाला सुरुवात झाली. परिणामी तडजोडीच्या आघाड्या आकारास येऊ लागल्या. सत्तेच्या साठमारीत माणूसपण हरवत जाऊन व्यक्तीद्वेष वाढत चालला. यात कोणताच नेता, पक्ष मागे नाही. मात्र बारमाही राजकारणामुळे गावातील वातावरण गढूळ होत आहे. (वार्ताहर)