शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

आंतरजातीय विवाहामुळे जाती निर्मूलन शक्य

By admin | Updated: April 20, 2015 00:32 IST

लातूर : महात्मा बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाहाला चालना दिली होती़ या आंतरजातीय विवाहामुळे जातीपातीच्या भिंती आपोआप गळून पडतात़

लातूर : महात्मा बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाहाला चालना दिली होती़ या आंतरजातीय विवाहामुळे जातीपातीच्या भिंती आपोआप गळून पडतात़ त्यामुळे आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात झाल्यास जाती निर्मूलन होईल, असे मत खा़ रामदास आठवले यांनी रविवारी येथे व्यक्त केले़भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित जाती निर्मूलन परिषदेचे उद्घाटक म्हणून खा़ रामदास आठवले बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा़ हर्षवर्धन कोल्हापूरे होते़ मंचावर प्रा़ सुनिल खोब्रागडे, व्हीएस पँथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके, सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष संजय सोनकांबळे, डॉ़ अजय ओव्हळ, पप्पू कागदे, ब्रम्हानंद चव्हाण, बाबासाहेब कांबळे, बाबा गायकवाड आदींची उपस्थिती होती़यावेळी खा़ आठवले म्हणाले बाबासाहेबांनी जातीयता नष्ट करण्यासाठी विविध स्तरावर लढे दिले असून, बहिष्कृत हितकारणी सभा, सर्वधर्मीय कामगारांचे संघटन व संविधान निर्मिती करून जातीयता घालविण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही जातीयता आहे. ही जातीयता घालविण्यासाठी बाबासाहेबांचा विचार घरा-घरांत पोहोचविण्याची गरज आहे. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. शासनाने यासाठी योगदान देण्याची गरज आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्या जिल्ह्यात जास्त आंतरजातीय विवाह होतील, त्या जिल्ह्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पाहिजे. शिवाय, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांपैकी एकाला शासकीय सेवेत घेऊन जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शासनाकडे आम्ही मागणी केली असून, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला ५ लाखांची मदत करावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे खा. आठवले यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे यांनी केला.