शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

शिक्षण संस्था, संघटनांचा आज शैक्षणिक बंद

By admin | Updated: December 12, 2014 00:56 IST

औरंगाबाद :शुक्रवारी शैक्षणिक बंदची हाक दिली आहे, तसेच नागपुरात या संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले आहे.

औरंगाबाद : ४० टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांचे फेरमूल्यांकन करण्याचा आदेश मागे घ्यावा, चिपळूणकर समितीच्या शिफारशी लागू करा, एमसीव्हीसीचा कायम शब्द वगळा, शिक्षण आयुक्त पद रद्द करा, विना अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके द्या, मध्यान्ह भोजन योजना लागू करा आदी मागण्यांसाठी राज्य शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक-शिक्षकेतर संघटना, मुख्याध्यापक संघटना आदींनी शुक्रवारी शैक्षणिक बंदची हाक दिली आहे, तसेच नागपुरात या संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. विविध संघटनांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारने मराठी व उर्दू माध्यमांच्या जवळपास ४,८०० शाळांना सन २००० मध्ये कायम विनाअनुदानित म्हणून मान्यता दिली; परंतु कर्मचारी, शिक्षकांचे वेतन वगळता शासनाचे सर्व नियम या शाळांवर बंधनकारक केले. संघटनांच्या सततच्या आंदोलनानंतर सन २००९ साली कायम हा शब्द वगळण्यात आला. सन २०१२ पासून अनुदान देण्याचे घोषित केले; परंतु त्यासाठी मूल्यांकनाच्या जाचक अटी लादल्या. त्यामुळे फक्त ५७ शाळा अनुदानासाठी पात्र ठरल्या. २०१४ मध्ये शासनाने या अटी शिथिल करून पुन्हा मूल्यांकनाचे अर्ज मागितले. त्यात १,३४३ शाळा अनुदानास पात्र ठरल्या. त्या शाळांना ४० टक्के अनुदान देण्याचे ठरले; परंतु दि. २५ नोव्हेंबर रोजी सरकारने पुन्हा या शाळांचे फेरमूल्यांकन करण्याचा घाट घातला आहे.या निषेधार्थ महाराष्ट्र विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर संघटनेने बुधवारपासून तीन दिवस शाळा बंद आंदोलन पुकारून गुरुवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता. उपरोक्त मागण्यांसाठी दि. १२ डिसेंबर रोजी शाळा बंदचा निर्णय मुंबई विभागाने घेतला होता. मुंबई विभागाला पाठिंबा देत औरंगाबादमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.