शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नगर पंचायतीच्या स्थापनेत दिरंगाई

By admin | Updated: May 11, 2014 00:08 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात येणार्‍या फुलंब्री आणि सोयगाव या दोन नगर पंचायतींच्या स्थापनेला प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसला आहे.

 सुनील कच्छवे , औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात येणार्‍या फुलंब्री आणि सोयगाव या दोन नगर पंचायतींच्या स्थापनेला प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसला आहे. दोन्ही नगर पंचायती स्थापन करण्यासाठी हरकती आणि आक्षेप मागविण्याचे शासनाचे पत्र जिल्हा प्रशासनाला नुकतेच प्राप्त झाले; मात्र वरिष्ठ स्तरावरून पत्र पाठविण्यात दिरंगाई झाल्यामुळे हरकती आणि आक्षेप मागविण्याची पत्रातील मुदत आधीच संपून गेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता याविषयी नगर प्रशासन खात्याकडे नव्याने मार्गदर्शन मागविले आहे. राज्यात अनेक तालुक्यांच्या ठिकाणी अजूनही ग्रामपंचायतीच कार्यरत आहेत. अशा सर्व तालुक्यांच्या ठिकाणी नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने फेबु्रवारी महिन्यात घेतला. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री आणि सोयगाव या दोन नवीन नगर पंचायती स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले. या निर्णयानंतर लगेचच नगर प्रशासन विभागाने नवीन नगर पंचायती स्थापन करण्याचा कार्यक्रम तयार केला; परंतु एप्रिलअखेरपर्यंत मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला त्याविषयी पत्रव्यवहार झाला नाही. आता नुकतेच जिल्हा प्रशासनाला नगर प्रशासन विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र ५ मे रोजी आले असून त्यात नवीन नगर पंचायतींच्या स्थापनेबाबतचा कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यानुसार १ मार्च ते ३१ मार्च या काळात नागरिकांकडून आक्षेप आणि हरकती मागविण्यात याव्यात असे म्हटले आहे. मात्र ही मुदत पत्र मिळण्यापूर्वीच संपली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला असून त्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारकडे नव्याने मार्गदर्शन मागविले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार ३१ मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवून त्यावर सुनावणी घेण्याच्या सूचना पत्रात दिलेल्या होत्या. त्यानुसार एप्रिलअखेरपर्यंत शासनाला सुनावणीचा अहवाल जाऊन मे किंवा जूनमध्ये या नवीन नगर पंचायती अस्तित्वात येण्याची शक्यता होती; परंतु नमनालाच दिरंगाईचा फटका बसल्यामुळे या नगर पंचायती स्थापन होण्यास आणखी काही काळ लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यातील उर्वरित नगर पंचायतींची कार्यवाहीही रखडली राज्य सरकारच्या फेबु्रवारीतील निर्णयाने मराठवाड्यात २२ नवीन नगर पंचायती स्थापन होणार आहेत. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे या नगर पंचायतींच्या स्थापनेची कार्यवाही रखडली आहे. नियोजित कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतर पत्र मिळाल्याने याविषयी कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त स्तरावरूनही यासंदर्भात मार्गदर्शन मागविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. नगर पंचायतींची पहिल्यांदाच स्थापना औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, कन्नड, वैजापूर, सिल्लोड, गंगापूर आणि खुलताबाद या सहा ठिकाणी नगर परिषदा आहेत. याशिवाय सातारा येथे नव्याने नगर परिषद स्थापन होण्याची कार्यवाही सुरू आहे. फुलंब्री आणि सोयगाव येथे जिल्ह्यात पहिल्यांदाच नगर पंचायती स्थापन होत आहेत.नगर परिषद आणि नगर पंचायत या दोन्हींच्या दर्जात थोडासा फरक असला तरी दोन्हींसाठी १९६५ सालचा एकच कायदा लागू आहे.