शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

काेरोनाकाळात घटली ८० टक्के रुग्णसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST

श्यामकुमार पुरे सिल्लोड : मार्चपासून आजपर्यंत सिल्लोड तालुक्यात कोरोनाचे एक हजारपेक्षा अधिक रुग्ण पुढे आले असून, त्यापैकी २९ जणांचा ...

श्यामकुमार पुरे

सिल्लोड : मार्चपासून आजपर्यंत सिल्लोड तालुक्यात कोरोनाचे एक हजारपेक्षा अधिक रुग्ण पुढे आले असून, त्यापैकी २९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व चाचणीच्या भीतीने सरकारी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची संख्या नऊ महिन्यात कमालीची रोडावली आहे. साधारण दरमहा दहा हजार रुग्णांची नोंद ओपीडीत होत होती. पण कोरोनाच्या काळात हा आकडा आठशे ते हजारपर्यंत आला आहे. नागरिक या काळात आजारी पडले; पण त्यांनी घरीच उपचार घेतल्याचे पुढे येत आहे.

ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्य नागरिक उपचार घेतात. सिल्लोडसारख्या उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाकाळापूर्वी दरमहा दहा हजार रुग्ण उपचारासाठी येत असल्याची नोंद आहे. यात थंडीताप, व्हायरल, टायफाइड, खोकला आदी आजारांचे अधिक रुग्णांचा समावेश आहे. नऊ महिन्यांच्या काळात साडेतीन लाख लोकसंख्या असणाऱ्या सिल्लोड तालुक्यात कोरोनाने २९ बळी घेतले. कोरोना आजार व भीतीपासून नागरिक सावरले असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र; मात्र लग्नकार्यातील उसळणारी गर्दी खूप काही सांगून जात आहे. मात्र नागरिकांना अजून काही दिवस नियम पाळणे गरजेचे आहे.

------ आजार पळाले की कोरोनाची भीती --------

कोरोनाकाळात बहुतांश नागरिक आजारी पडले हाेते. पण कोरोनाच्या भीतीपोटी नागरिकांनी शासकीय रुग्णालयात जाणे टाळले असल्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी गेलो तर संशयित म्हणून डॉक्टरांकडून कोरोनाची चाचणी करण्यात येईल या भीतीने अनेकांनी घरी राहून मेडिकलमधील औषधी घेतल्या असल्याचे चित्र त्या काळात होते. यासह आयुर्वेदिक उपचार, घरगुती नुस्के, विविध काढे घेऊन नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवली.

------- कधी नव्हे इतकी अंड्यांची विक्री----

कोरोना आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी अनेक पर्याय वापरले. यात बहुतांश नागरिकांनी जे कधी अंडे खात नव्हते त्यांनीसुद्धा या काळात अंड्यांवर ताव मारला. यामुळे अंड्यांची विक्री या काळात सर्वाधिक झाली. अंडे आणि काढा यावरच नागरिकांचा भर होता. परिणामी सध्या अनेकांना मूळव्याधाचा त्रास होत आहे.

- कॉप्शन : सिल्लोडचे उपजिल्हा रुग्णालय.