औरंगाबाद : रेल्वेस्टेशन रोडवर भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने सोमवारी सकाळी ३०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फोडली. त्यामुळे लाखो लिटर शुद्ध पाणी नाल्यात वाहून गेले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने जलवाहिनीची दुरुस्तीकेली.हॉटेल विट्सजवळ भूमिगत गटार योजनेचे मागील काही दिवसांपासून काम सुरू आहे. मंगळवारी सकाळी कंत्राटदाराने मुख्य जलवाहिनी फोडली. त्यामुळे नाल्यात लाखो लिटर शुद्ध पाणी वाहून जात होते. परिसरातील नागरिक उभे राहून हे दृश्य पाहत होते. काही नागरिकांनी मनपा अधिकारी व औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर कंपनीने पाणीपुरवठा थांबविला. तेव्हापर्यंत जवळपास पाच ते सहा तास वाया गेले होते. लाखो लिटर पाणी यातून वाहून गेले. कंपनीने जलवाहिनीची दुरुस्ती केल्यावर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला.मागील आठवड्यात भूमिगत गटार योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने हिमायत बागेच्या पाठीमागे जलाल कॉलनीत काम केले. त्यामुळे नहर-ए-पाणचक्कीला तडे गेले. या गंभीर प्रकरणात मनपाने कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केली नाही. शहरातील इतिहासप्रेमी कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत आहेत. नहर-ए-पाणचक्कीची मनपानेच डागडुजी करावी, अशी मागणीही करण्यात आली होती. सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळही मंगळवारी सकाळी एमआयडीसीची जलवाहिनी फुटली. त्यामुळे व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाहून गेले.
जलवाहिनी फुटल्याने दुष्काळात लाखो लिटर पाणी नाल्यात
By admin | Updated: April 27, 2016 00:36 IST