शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

इंग्रजीतील ‘त्या’ उपविधीमुळे सदस्यांची गोची !

By admin | Updated: May 16, 2014 00:14 IST

लातूर : सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाची दिशा ठरविणार्‍या मनपा सदस्यांची कचर्‍याच्या मुद्यावर चांगलीच गोची झाली.

लातूर : सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाची दिशा ठरविणार्‍या मनपा सदस्यांची कचर्‍याच्या मुद्यावर चांगलीच गोची झाली. घनकचरा व्यवस्थापनासाठी उपविधीचा मुद्दा चर्चेसाठी समोर येताच राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजा मणियार यांनी उपविधीतील नियम मराठीत तयार करून सभागृहात मांडा, असा आग्रह धरीत प्रशासनाला धारेवर धरले. ठरावाला सूचक असलेले रविशंकर जाधव यांनी इंग्रजीतील उपविधी वाचून दाखवावा, अशी विनंती करीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बराचवेळ गोंधळ घातला. गोंधळातच या ठरावाला काँग्रेसचे गिरीश पाटील यांनी अनुमोदन दिले. लातूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झाली. मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याच्या मुद्यावरच सभागृहात जवळपास दोन तास चर्चा झाली. इतिवृत्तात दुरुस्ती करण्याच्या सूचना चंद्रकांत चिकटे, दीपक सूळ, राजा मणियार, शैलेश स्वामी, लक्ष्मण कांबळे, रवी सुडे यांनी मांडल्या. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्याकरिता घनकचरा व्यवस्थापन उपविधीच्या मसुद्याचा विचारविनिमय करण्यासाठी सभागृहात विषय येताच सदरील विषय इंग्रजीत असल्याने याला बहुतांश सदस्यांनी विरोध दर्शविला. इंग्रजी भाषेत असलेली २० पानांची नियमावली मराठीत सभागृहात सादर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीसह काँग्रेसच्याही काही नगरसेवकांनी लावून धरली. इंग्रजीतील उपविधी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी वाचून दाखविला. बराचवेळ सुरू असलेल्या या गोंधळाला महापौरांनी पूर्णविराम दिला. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांचे पालन करून सदरील विषय पुढील बैठकीत सभागृहात मांडण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. मनपास शासनाद्वारे मंजूर झालेल्या आकृतीबंधानुसार विविध पदांवर करावयाच्या नियुक्तीचे नियमन व सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप नियमावलीस विचारविनिमय करून निर्णय घ्यावयाचा असताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी कर्मचारी भरतीसाठी नगरसेवकांची समिती नियुक्त करा, नियमात बसत असेल तर नगरसेवकांना समितीत सामावून घ्या, अशी मागणी केली. जुन्या कर्मचार्‍यांना प्रमोशन देत जात पडताळणीची शहानिशा करूनच जागा भराव्यात, अशा सूचना चंद्रकांत चिकटे यांनी केल्या. लक्ष्मण कांबळे यांनी ठराव मांडला. रविशंकर जाधव यांनी याला अनुमोदन दिले. महापौर स्मिता खानापुरे यांनी नगरसेवकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन कारवाई करावी. त्यानंतर सभागृहात हा विषय मांडावा, अशा सूचना केल्या. नरेंद्र अग्रवाल यांनी ५० टक्के पाणी वाया जात असल्याचे सांगत एमजीपीचा कार्यकाळ संपल्यावर ही योजना मनपाकडे वर्ग करावी, अशी सूचना मांडली. सदस्यांच्या सूचनांवरून हा विषय नामंजूर करण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. यावेळी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, उपमहापौर सुरेश पवार, अतिरिक्त आयुक्त शिवाजी शिंदे यांच्यासह मनपाचे अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते. -अधिक वृत्त हॅलो २ वर एमजीपीचा प्रस्ताव नामंजूर... लातूर पाणीपुरवठा योजना, देखभाल व दुरुस्ती व्यवस्थापन योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत २० वर्षे चालविण्यासाठी देण्याबाबतचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. तीन वर्षे अजून जुनाच करार संपलेला नसताना मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेत घेतलेल्या या विषयावर सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अ‍ॅड. दीपक सूळ यांनी २० वर्षांचा करार करण्याची एवढी घाई कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी रोष व्यक्त केला. शहरात सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ४२ कोटी रुपयांची योजना राबविण्यात येणार असल्याने २१ कोटी लोकवाटा भरावयाचा आहे. मनपाकडे पैसे नसल्याने ही योजना एमजीपीकडे सोपविण्याचा युक्तिवाद प्रशासनाकडून करण्यात आला. यावर राजा मणियार म्हणाले, तीन वर्षांत आपण सक्षम झालो तर तीन वर्षांनंतर सदरील योजना मनपा प्रशासनाने चालवेल, अशी अट घालूनच या विषयाला मंजुरी द्यावी.