शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

पावसाअभावी पिके धोक्यात

By admin | Updated: July 28, 2014 00:58 IST

विष्णू वाकडे, कारला कारला : जालना तालुक्यातील कारला भाटेपुरी परिसरात पावसाळा सुरू होऊनही दोन महिने उलटले तरीही समाधानकारक पाऊस झाला नाही.

विष्णू वाकडे, कारलाकारला : जालना तालुक्यातील कारला भाटेपुरी परिसरात पावसाळा सुरू होऊनही दोन महिने उलटले तरीही समाधानकारक पाऊस झाला नाही. परिणामी खरिपाची पिके तसेच ऊस व मोसंबी बागांचे पाण्याअभावी अतोनात नुकसान होत आहे. कारला, हातवण, वडीवाडी, थेरगाव, हिवरा, दोषणगाव, ममदाबाद, भाटेपुरी, माळीपिंपळगाव सह परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.जिल्ह्यात इतरत्र तालुक्यात थोडाबहुत पाऊस पडला. त्यावेळी सुध्दा या भागात पावसाने हुलकावणी दिली. सुरूवातीस अगदी मोजक्याच पावसावर ७ ते ८ जुलै रोजी खरिपाच्या पेरण्या झाल्या. परंतु पावसाने मोठी दडी मारल्याने झालेली पेरणी बहुतांश भागात वाया गेली. गेल्या तीन दिवसांत पुन्हा रिमझिम पाऊस झाल्याने हतबल झालेल्या बळीराजाने दुबार पेरणीस सुरूवात केली.कारला भाटेपुरी परिसरात बारामही बागायती पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मोसंबी तसेच उसाचे उत्पन्न या भागात जास्त आहे. मे महिन्यातच विहिरींनी तळ गाठल्याने आता पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. कुंडलिका नदीला अद्याप एकही पूर तर सोडाच पाणीसुध्दा वाहून गेले नाही. पाण्याचे स्त्रोत फक्त विहिरी असल्याने परिसरात मोठी समस्या निर्माण होत आहे. विहिरी तसेच कूपनलिकांची पाणी पातळी खोलवर गेली आहे. परिणामी मोसंबी चिकु, यांच्यासह उसाचे पीकही धोक्यात आले आहे.शेतकरी गंगाधर सांगोळे यांनी सांगितले की, जिथे दोन कापसाच्या पिकामध्ये लागवड होत होती तेथे आता चार ते पाच पिशव्या कपाशीचे बियाणे लागले. मूग, उडीद, सोयाबीन यांची पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागल्याचे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करावी लागल्याचे ते म्हणाले. ऊस उत्पादक यशवंत देशमुख यांनी सांगितले की, सूक्ष्मसिंचनाचा उपयोग करून कसाबसा ऊस आतापर्यंत टिकून ठेवला. परंतु दुष्काळी परिस्थितीने पाण्याची पातळी खालावली. त्यामुळेच उसाचे पीक सुध्दा धोक्यात आले. मोसंबी उत्पादक अशोकराव गायकवाड, सुभाषराव गायकवाड यांनी सांगितले की, मोसंीच्या झाडावर आंबे बहाराच्या मोसंब्या असून फळबागेस पाण्याची नितांत गरज आहे. हात तोंडाशी आलेले पीक कसे पुर्णत्वास जाईल याची चिंता वाटत आहे.शिवाय झाडास सध्या मिळत असलेल्या ताणाने मोसंबीच्या झाडास धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच पावसाअभावी खरीप तर धोक्यात आले आहेच; शिवाय फळबागा व उसाचे पीकही संकटात सापडले आहे. परिणामी शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक संकट कोसळल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.