शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

पावसामुळे जिल्ह्यातील टँकरची संख्या घटली

By admin | Updated: July 14, 2016 01:00 IST

गजानन वानखडे , जालना जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे टँकर संख्येत मोठी घट झाली आहे. साडेसहाशे असलेली टँकर संख्या ९१ वर आली आहे. तीन तालुके टँकरमुक्त झाली आहेत

गजानन वानखडे , जालनाजिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे टँकर संख्येत मोठी घट झाली आहे. साडेसहाशे असलेली टँकर संख्या ९१ वर आली आहे. तीन तालुके टँकरमुक्त झाली आहेत. तर अंबड, बदनापूर, आणि घनसावंगी या तालुक्यांत विहिरींना पाणी आल्याने टँकर बंद करण्यात आले आहेत.जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अल्पसा पाऊस झाला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात टँकरवर निधी उपलब्ध करण्यात आला होता. जिल्ह्यात जून महिन्यापर्यंत ६५० टँकर सुरू होते. जिल्ह्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने टँकरचा संख्या घटून ९१ आली असल्याने प्रशासनाचा पाण्यावर होणारा लाखो रूपयांचा खर्च सुध्दा वाचणार आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. अंबड, घनसावंगी आणि बदनापूर या तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने गावातील नदी, नाले आणि शेतकऱ्यांच्या विहिरीसह गावाला पाणीपुरवठा करणारे प्रकल्पांमध्ये पाणी आल्याने टँकर बंद करण्यात येत असल्याचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांनी जिल्हा प्रशासनाला कळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. निव्वळ पाणी पुरवठ्यावर कोट्यवधी रूपयांचा निधी जिल्हा परिषदेकडून खर्च करण्यात येतो. परंतु जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पाण्याचे स्त्रोत आटल्याने सर्वच तालुक्यांत पाणी टंचाईच्या झळा ग्रामस्थांना सहन कराव्या लागत होत्या. परंतु पावसाने विलंबाने का होईना जोरदार सुरूवात केल्याने बहुतांश तालुक्यांतील प्रकल्पांत पाणीसाठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. तर गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तुडुंब भरल्याचे चित्र असल्याने तालुक्यातील टँकर कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. भोकरदन, जाफराबाद, या तालुक्यांत अद्यापही म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने दोन्ही तालुक्यांत ८६ टँकर सुरू आहेत. भोकरदनमध्ये ६५ तर जाफराबाद मध्ये २१ टँकर सुरू असून, आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास ते बंद होण्याची चिन्हे आहेत. जालना तालुक्यात ५ टँकर, परतूर येथे फक्त १ , मंठ्यात २ असे एकून ९१ टँकर सुरू असल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र आंटद यांनी सांगितले. जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. निव्वळ पाणी पुरवठयावर कोट्यवधी रूपये जिल्हा परिषदेकडून खर्च करण्यात येतात. परंतु जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पाण्याचे स्त्रोत आटल्याने सर्वच तालुक्यांत पाणी टंचाईच्या झळा ग्रामस्थांना सहन कराव्या लागत होत्या. परंतु पावसाने थोडे उशिराने का होईना जोरदार सुरूवात केल्याने प्रकल्पांत पाणीसाठा वाढत आहे. जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून अल्पसा पाऊस झाला आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पावसामुळे टँकरच्या संख्येत मोठी घट करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.