शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

पावसाने फेरले पाच लाख हेक्टर पेरण्यांवर पाणी

By admin | Updated: July 3, 2014 00:16 IST

दिनेश गुळवे, बीड यावर्षी पुन्हा दुष्काळाचा फेरा पडला आहे. पावसाने तोंड फिरविल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. ‘

दिनेश गुळवे, बीडयावर्षी पुन्हा दुष्काळाचा फेरा पडला आहे. पावसाने तोंड फिरविल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. ‘आता तरी पाऊस पाड रे बा विठ्ठला’ अशी आर्त हाक शेतकरी विठ्ठलाकडे करू लागला आहे. पाऊस नसल्याने तब्बल पाच लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबलेल्या आहेत. गेल्यावर्षी जून अखेर जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर पेरण्या झाल्या होत्या. यावर्षीमात्र अद्याप शेतकऱ्यांनी ‘चाड्यावर मूठ’ धरलेलीच नाही.बीड जिल्ह्यात ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीची आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, बाजरी, ज्वारी, तीळ आदी पिकांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण मुबलक होते. गतवर्षी जून अखेर १३३ मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी मात्र पावसाने दडी मारली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३३ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्याप पावसाची एकही सर पडलेली नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असते. कापूस शेतकऱ्यांसाठी ‘पांढरं सोनं’ असल्याने शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन कापसाची लागवड करतात. गेल्यावर्षी कापसाचे उत्पन्न समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांकडे चार पैसे शिल्लक होते. यातून शेतकऱ्यांनी मशागतीसह बियाणे खरेदीही केली आहे. जिल्ह्यातील शेतीच्या मशागती पूर्ण झाल्या असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची डोळे आकाशाकडे लागली आहेत. मात्र आता महिना होत आला तरी पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यात केवळ ६ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झालेली असून इतर पिकांचीही सहा हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात पाणी आहे. या पाण्यावर ठिबकद्वारे ही लागवड झालेली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी १ जुलै पर्यंत २ लाख ४५ हजार ९०० हेक्टरवर लागवड झाली होती. ही पेरणी एकूण पेरणी क्षेत्राच्या ४४ टक्के झाली होती. यामध्ये कापूस, खरीप ज्वारी, बाजरीसह इतर पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागातील बिनवडे यांनी सांगितले. गेल्या वर्षी जिल्ह्यात १ जुलैपर्यंत उडीद, भात व तीळ या पिकांचा पेराही बऱ्यापैकी झाला होता. या वर्षी या पिकांचा पेरा रखडला आहे.(भाग-२)वाण गतवर्षीची पेरणी (क्षेत्र हेक्टर मध्ये) यावर्षीची पेरणी कापूस १ लाख ५२ हजार ५०० हे. ६ हजार ५१९सोयाबीन ३८ हजार ५०० ३ हजार ९४५तूर ११ हजार ५०० ७००उडीद ३ हजार ३०० ००मूग ३ हजार ५०० ७६ हे.भात ३०० ००बाजरी २५ हजार ६०० ३००तीळ ४०० ००ज्वारी ५ हजार ८०० १ हजार १००पुरेशा पावसावरच लागवड करावीजिल्ह्यात आतापर्यंत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोड्या ओलीवर पेरणी करू नये. पुरेशी ओल नसेल तर दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय मुळे यांनी व्यक्त केले.