शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीवर पावसाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:55 IST

ऐन निवडणूक कालावधीत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने महापालिका निवडणुकीवर पावसाचे सावट असून मनपाने शासकीय तंत्रनिकेतन परिसरात वॉटरप्रूफ टेन्ट टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी सदर इमारत गळतीच्या दुरुस्तीबाबतचे पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: ऐन निवडणूक कालावधीत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने महापालिका निवडणुकीवर पावसाचे सावट असून मनपाने शासकीय तंत्रनिकेतन परिसरात वॉटरप्रूफ टेन्ट टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी सदर इमारत गळतीच्या दुरुस्तीबाबतचे पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.मराठवाडा,विदर्भ,मध्य महाराष्टÑात भारतीय हवामान खात्याने ५ ते १४ आॅक्टोबरदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यात शेजारील आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथेही पावसाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड महापालिका निवडणूक विभाग चिंताक्रांत झाला आहे. ऐन निवडणुकीत पाऊस झाल्यास मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने आणखीच जास्त चिंता वाढली आहे.याबाबत आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले, सध्या ईव्हीएम मशीन या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्ट्राँगरुममध्ये ठेवल्या आहेत. या इमारतीबाहेरील टेन्ट हा वॉटरप्रूफ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातच इमारतीची गळती दुरुस्त करण्याबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून २ लाख ७० हजार रुपयांचा निधीही देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.दरम्यान, महापालिका निवडणूक विभागाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे.जुन्या नांदेडातील देगलूरनाका व हैदराबाग परिसरातील ४० शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून मतदान जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी प्रत्येकी चार शिक्षकांची दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके शाळेत जाऊन सर्व विद्यार्थ्यांना मतदान जागृतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यातून मतदानाबाबतची जागृती घराघरांपर्यंत होईल. तसेच भावी मतदारामार्फत मतदानवाढीचे प्रयत्न केले जात आहेत.दरम्यान, जिल्हा प्रशासन अतिवृष्टीच्या इशाºयानंतर सज्ज झाले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. विजांचा कडकडाट होत असल्यास शेतकरी, नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे. ओढे, नदी, नाले भरुन वाहत असल्यास ते ओलांडण्याचे टाळावे. तसेच आपत्तीच्या काळात सिंचन भवन येथे दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२६३८७० या क्रमाकावर संपर्क साधावा.