शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

बालिका-बालकांच्या प्रमाणाची रुंदावली दरी!

By admin | Updated: June 23, 2016 01:13 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद दर हजारी मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी मागील दोन दशकांमध्ये शासनाने वेगवेगळे उपक्रम, योजना हाती घेतल्या. सामाजिक संघटनांकडूनही जनजागृती केली जात आहे.

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाददर हजारी मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी मागील दोन दशकांमध्ये शासनाने वेगवेगळे उपक्रम, योजना हाती घेतल्या. सामाजिक संघटनांकडूनही जनजागृती केली जात आहे. असे असतानाही जिल्ह्यातील बालिका-बालकांच्या प्रमाणातील दरी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर येते. मागील वीस वर्षामध्ये दर हजारी मुलींच्या प्रमाणात ८० अंकाची घट झाली आहे. तर २०१५-१६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक पहाणी सर्वेक्षण अहवालानुसार जन्मत:चे लिंग गुणोत्तर ७६२ एवढे खाली आले आहे. हे धक्कादायक चित्र बदलण्यासाठी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसोबतच अन्य उपाययोजनाही प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. वंशाचा दिवा हवाच, या हव्यासापोटी मागील काही दशकात स्त्रीभृणहत्या वाढल्या. त्यामुळेच दर हजारी मुलींचे प्रमाण झपाट्याने कमी होत गेले. सदरील चिंताजनक स्थिती समोर आल्यानंतर शासनाकडून वेगवेगळे उपक्रम, योजना हाती घेतल्या. ज्यामुळे मुला-मुलींच्या प्रमाणातील दरी कमी होईल, असा यामागचा उद्देश. एवढे करूनही मुलींचे प्रमाण काही केल्या वाढले नाही. मागील पाच-सहा वर्षांपासून हे प्रमाण उंचाविण्यासाठी शासनाकडून गंर्भलिंग निदान विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली. त्याचप्रमाणे विस्तृत प्रमाणात जनजागृतीही करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून काही जिल्ह्यात मुलींचे प्रमाण किंचितसे वाढले. परंतु, उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार केला असता, आजही उपरोक्त परिस्थिती फारशी बदलल्याचे दिसत नाही. वीस वर्षापूर्वीच्या म्हणजेच १९९१ च्या जनगणनेतून समोर आलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दर हजारी पुरूषामागे ९४७ स्त्रीया असे लिंग गुणोत्तर होते. विशेष म्हणजे, सर्व आठही तालुक्यांमध्ये हे प्रमाण ९०० पेक्षा अधिक होते.दरम्यान, १९९१ नंतर म्हणजेच दहा वर्षांनी (२००१) जनगणना झाली. या कालावधीत मुलींचे प्रमाण वाढण्याऐवजी आणखीनच कमी झाले. आठ पैकी पाच तालुक्यात दर हजारी मुलींचे प्रमाण ९०० पेक्षाही कमी झाले. तर उमरगा, लोहारा आणि तुळजापूर या तालुक्यात मात्र दर हजारी मुलींचे प्रमाण ९०० ते ९५० एवढे होते. सदरील धक्कादायक आकडे समोर आल्यानंतर शासनाने जनजागृतीसोबतच कायद्याचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलींचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. २०११ मध्ये जनगणना झाली असता मागील वीस वर्षांच्या तुलनेत उमरगा वगळता उर्वरित सातही तालुक्यात मुलींच्या प्रमाणात मोठी घट झाली. आठ पैकी चार तालुक्याचे प्रमाण ८०० ते ८५० एवढे खाली आले. लोहारा, उस्मानाबाद आणि तुळजापूर या तालुक्यात हे प्रमाण ८५० ते ९०० दरम्यान होते. मागील वीस वर्षांतील मुलींच्या प्रमाणाचे आकडे पाहिल्यास तब्बल ८० अंकाची घट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर येते. असे विदारक चित्र बदलण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना योजिल्या जात असल्या मुलींचे प्रमाण वाढण्याचे नाव घेत नाही. केंद्र शासनाच्या वतीने २०१५-१६ या वर्षामध्ये जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौटुंबिक पहाणी सर्वेक्षण अहवालानुसार स्त्री-पुरूषाचे जन्मत: लिंग गुणोत्तर ७६२ एवढे आहे. याचा अर्थ आजही काही मंडळी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान करून मुलींचा गर्भ जग पाहण्यापूर्वीच नष्ट करण्याचे कृत्य करीत आहेत.