शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

अधिष्ठातांमुळेच पदव्युत्तर प्रवेशाचे वाजले तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचे अधिष्ठातांमुळे तीनतेरा वाजले असल्याचा खळबळजनक आरोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचे अधिष्ठातांमुळे तीनतेरा वाजले असल्याचा खळबळजनक आरोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. विद्यापीठातील टॉपच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रांसह ९० टक्के विभागात अत्यल्प प्रवेश झाले आहेत. महाविद्यालयांची अवस्था तर त्याहून वाईट बनली असल्यामुळे संतापलेल्या कुलगुरूंनी विविध विभागांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा प्रवेशाची विदारक अवस्था समोर आली.विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचा गुंता अधिकच वाढला आहे. ढिसाळ नियोजन आणि प्रत्येक दिवशी नवीन नियम काढल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठातील एकूण विभागांमध्ये शेवटच्या दिवशी प्रवेशाच्या ५० टक्केही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. मागच्या वर्षी रसायनशास्त्र विभागातील ७० जागांसाठी ११०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. मात्र यावर्षी विद्यापीठाने लावलेल्या यादीतील केवळ ४२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. हीच अवस्था भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित, सांख्यिकीयशास्त्राची बनली आहे. सामाजिक शास्त्रातील काही विभागांमध्ये तर दोन आकडीही प्रवेश झाले नसल्याचे पाहणीत समोर आले. या गोंधळमुळे कुलगुरूंनी थेट रसायनशास्त्र, संगणशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, सांख्यिकीय, पर्यावरण आदी विभागांना भेटी दिल्या. या पाहणीत मोठा सावळा गोंधळ समोर आला. रसायनशास्त्र विभागात ७० जागा असताना केवळ ६० विद्यार्थ्यांची यादी पाठविली. मात्र स. भु. विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राचे ६० जागा असताना ७५ विद्यार्थ्यांची यादी पाठविली, असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. स्पॉट अ‍ॅडमिशनसाठी ठेवलेल्या अर्जातही मोठ्या प्रमाणात चुका आहेत. त्यावर अनेक प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्ष वास्तवाचा विचार न करता सर्व प्रक्रिया एसी हॉलमध्ये बसून अधिष्ठातांनी राबविली. या अधिष्ठातांच्या मनमानीमुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. या अधिष्ठातांवर कारवाई करण्याची मागणीही अनेकांनी कुलगुरूंकडे केली. त्यावर कुलगुरूंनीही अधिष्ठातांच्या हलगर्जी आणि वास्तववादी भूमिकेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्याचे मान्य केले. प्रवेश प्रक्रिया पार पाडताच सर्व अधिष्ठातांची उचलबांगडी करण्याचे सूतोवाचही कुलगुरूंनी केले.शेवटपर्यंतही गुणवत्ता यादी नाहीचपदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दोन फेºयाची प्रवेश प्रक्रिया संपली. तरीही विद्यापीठ प्रशासनाने गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. या गुणवत्ता यादीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे केल्या आहेत. अनेकांना सीईटीमध्ये चांगले मार्क मिळालेले असताना त्यांच्यापेक्षा कमी मार्क पडलेल्या विद्यापीठातील विभागात प्रवेश मिळाले. यात विशेष म्हणजे अशा विद्यार्थ्यांना दोन्ही फेºयांमध्ये प्रवेश मिळालेला नाही.