शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

अधिष्ठातांमुळेच पदव्युत्तर प्रवेशाचे वाजले तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचे अधिष्ठातांमुळे तीनतेरा वाजले असल्याचा खळबळजनक आरोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचे अधिष्ठातांमुळे तीनतेरा वाजले असल्याचा खळबळजनक आरोप कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केला. विद्यापीठातील टॉपच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रांसह ९० टक्के विभागात अत्यल्प प्रवेश झाले आहेत. महाविद्यालयांची अवस्था तर त्याहून वाईट बनली असल्यामुळे संतापलेल्या कुलगुरूंनी विविध विभागांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा प्रवेशाची विदारक अवस्था समोर आली.विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्रवेशाचा गुंता अधिकच वाढला आहे. ढिसाळ नियोजन आणि प्रत्येक दिवशी नवीन नियम काढल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठातील एकूण विभागांमध्ये शेवटच्या दिवशी प्रवेशाच्या ५० टक्केही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. मागच्या वर्षी रसायनशास्त्र विभागातील ७० जागांसाठी ११०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. मात्र यावर्षी विद्यापीठाने लावलेल्या यादीतील केवळ ४२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. हीच अवस्था भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित, सांख्यिकीयशास्त्राची बनली आहे. सामाजिक शास्त्रातील काही विभागांमध्ये तर दोन आकडीही प्रवेश झाले नसल्याचे पाहणीत समोर आले. या गोंधळमुळे कुलगुरूंनी थेट रसायनशास्त्र, संगणशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, सांख्यिकीय, पर्यावरण आदी विभागांना भेटी दिल्या. या पाहणीत मोठा सावळा गोंधळ समोर आला. रसायनशास्त्र विभागात ७० जागा असताना केवळ ६० विद्यार्थ्यांची यादी पाठविली. मात्र स. भु. विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राचे ६० जागा असताना ७५ विद्यार्थ्यांची यादी पाठविली, असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. स्पॉट अ‍ॅडमिशनसाठी ठेवलेल्या अर्जातही मोठ्या प्रमाणात चुका आहेत. त्यावर अनेक प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्ष वास्तवाचा विचार न करता सर्व प्रक्रिया एसी हॉलमध्ये बसून अधिष्ठातांनी राबविली. या अधिष्ठातांच्या मनमानीमुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. या अधिष्ठातांवर कारवाई करण्याची मागणीही अनेकांनी कुलगुरूंकडे केली. त्यावर कुलगुरूंनीही अधिष्ठातांच्या हलगर्जी आणि वास्तववादी भूमिकेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्याचे मान्य केले. प्रवेश प्रक्रिया पार पाडताच सर्व अधिष्ठातांची उचलबांगडी करण्याचे सूतोवाचही कुलगुरूंनी केले.शेवटपर्यंतही गुणवत्ता यादी नाहीचपदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दोन फेºयाची प्रवेश प्रक्रिया संपली. तरीही विद्यापीठ प्रशासनाने गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. या गुणवत्ता यादीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे केल्या आहेत. अनेकांना सीईटीमध्ये चांगले मार्क मिळालेले असताना त्यांच्यापेक्षा कमी मार्क पडलेल्या विद्यापीठातील विभागात प्रवेश मिळाले. यात विशेष म्हणजे अशा विद्यार्थ्यांना दोन्ही फेºयांमध्ये प्रवेश मिळालेला नाही.