शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

दारूला स्पर्शही नसल्याने किनगावात सौख्याची परंपरा...

By admin | Updated: June 5, 2014 00:46 IST

संजीवकुमार देवनाळे, किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून,

संजीवकुमार देवनाळे, किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, हे गाव तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असले तरी या गावामध्ये अवैध दारू विक्रीचे एकही दुकान नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिकांमध्ये सौख्याची परंपरा आजही कायम आहे. किनगाव हे लातूर, परभणी, बीड या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरचे गाव असून, या तिन्ही जिल्ह्यांतील गावांचा थेट संपर्क किनगावाशी येतो. जिल्ह्यातील अनेक गावांत अवैध दारू विक्री, बिअर बारच्या दुकानासाठी स्पर्धा लागली असली, तरी किनगावमध्ये मात्र वयोवृद्ध व जाणकार मंडळींनी अद्यापही अवैध दारू विक्रीला गावात येऊ दिले नाही. मधुकर मुंढे यांनी १९७७ ते १९९६ दरम्यान, गावच्या लोकप्रतिनिधींची भूमिका सांभाळली. सलग तीनवेळा ते बिनविरोध सरपंच झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गरीब लोकांसाठी दीडशे घरे बांधून दिली व त्या घरांना ‘ठाकरेनगर’ असे नाव दिले. याच काळात गावाची बाजारपेठ ओळखून उदगीर येथील एका व्यावसायिकाने अवैध दारू विक्रीचे दुकान चालू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळीही गावातील लोकांनी त्याला विरोध करून त्याचा उद्देश हाणून पाडण्याचे काम केले. गावातील सामाजिक कार्याने प्रेरित झालेले मधुकर मुंढे, मैनोद्दीन देशमुख, देवेंद्र आमले यांनी गावात अवैध दारू विक्रीला स्थान देऊ नये, यासाठी त्यावेळी आमरण उपोषण केले. पण; त्यांच्या या सामाजिक कार्याला त्यावेळी दाद ना फिर्याद, अशी परिस्थिती झाली. तरीही जिद्दीने कार्य केल्यामुळे शासनाला अवैध दारू विक्रीचा व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर मात्र कोणी तसा प्रयत्न करण्याचेही धाडस केले नाही. ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव... अहमदपूर तालुक्यातील किनगावात आनंदात जगणार्‍या नागरिकांना या अवैध व्यवसायाची दृष्ट लागू नये, या दृष्टिकोनातून ग्रामस्थांनी किनगाव ग्रामपंचायतीमध्ये बहुमताने दारू विक्री कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच बाहेरील कोणी व्यक्ती या उद्देशाने आला तर त्यालाही ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र द्यायचे नाही, असाही निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून गावामध्ये सौख्याची परंपरा राबत असून, तीच परंपरा कायम ठेवण्याचे काम माजी सरपंच त्रिवेणी लव्हराळे, शिवाजी कांबळे, लताताई मुंडे आदींनी केली आहे. तसेच यापुढील कालावधीतही ती परंपरा पुढे सांभाळण्याचे काम सरपंच विठ्ठलराव बोडके करीत आहेत.