शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

कायम तलाठ्याअभावी देवळाईत मालमत्ता व शेतीविषयक कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:05 IST

औरंगाबाद: देवळाई परिसरातील महसुली कारभारासाठी कायम तलाठी नसल्याने, नागरिकांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. मालमत्ता, तसेच शेतीविषयक कामे ...

औरंगाबाद: देवळाई परिसरातील महसुली कारभारासाठी कायम तलाठी नसल्याने, नागरिकांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

मालमत्ता, तसेच शेतीविषयक कामे लांबणीवर पडत आहेत. मनपात भाग समाविष्ट झाला असला, तरी परिसरातील विविध मालमत्तांच्या कामासह पीककर्ज, तसेच पेरेपत्रकांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. बहुतांश शेतीचे रूपांतर सिमेंटच्या जंगलात झालेले आहे. टोलेजंग इमारती उभा राहिल्यास सदनिकांच्या व्यवहारासाठीही नागरिकांना तलाठी कार्यालयावर अवलंबून राहावे लागत आहे.

प्रभारीवरच कारभार किती दिवस

देवळाईचा कारभार पंढरपूर व सिंदोन, बिंदोन, तसेच इतर कोणत्याही तलाठ्याकडे दिला जातो. लाचेच्या प्रकरणात येथील तलाठी अडकल्यापासून नवीन कायमस्वरूपी तलाठी अद्याप आलेला नाही. अशा दोन घटना घडल्याने, येथील कारभार सातत्याने प्रभारीकडेच देण्यात येत आहे. कायमस्वरूपी तलाठी देण्याची गरज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मालमत्तांची कामे आडकली...

अनेक व्यावसायिकांच्या मालमत्तांच्या नोंदी घेण्यासाठी नागरिकांना फिरावे लागत आहे. बँकेचे व्यवहार करण्यासाठी सातबाऱ्यावर मालमत्ताची नोंदणी व इतर कामासाठी तलाठी असणे गरजेचे आहे. त्यावर लक्ष दिले जात नाही, असे हकीम पटेल, हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची कामे रेंगाळली...

शेतकऱ्यांना पीककर्ज व इतर पेरेपत्रक, तसेच इतर कामासाठी तलाठी कार्यालयात महत्त्वाची कामे असतात. खरीप हंगाम सुरू झाल्याने, त्यासाठी शेतकरी बँकांकडून कर्ज काढण्यासाठी लागणारी कागदपत्र मिळत नसल्याने, शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. महसूल विभागाने दखल घेऊन देवळाई भागासाठी कायमस्वरूपी तलाठी देण्याची गरज आहे, याविषयी महसूल विभागात अधिकाऱ्यांकडे मागणी करणार आहोत, असे माजी सरपंच करीम पटेल यांनी सांगितले.

- लॉकडाऊनमध्ये विविध मालमत्तांचे व्यवहार रखडले.

- नागरिकांच्या तलाठी कार्यालयावर होतात फेऱ्या.

- उद्या या, आज दुसऱ्या सजावर तलाठी आहेत.

- बँकासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र रखडली.

- प्रभारी तलाठी कधी येणार असाच प्रश्न नागरिकांना पडतो.

- सातबाऱ्यावर नोंदीसाठी उशीर होत आहे.