शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

चालकाअभावी उपकेंद्राची बसही धूळ खात

By admin | Updated: August 27, 2015 00:23 IST

हणमंत गायकवाड , लातूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राला चांगला केअर टेकर मिळाला नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून

हणमंत गायकवाड , लातूरस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राला चांगला केअर टेकर मिळाला नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबरोबर अनेक सुविधांचाही अभाव आहे़ गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला चालकच नाही़ त्यामुळे ही बस उपकेंद्राच्या परिसरात शोभेच्या वस्तुगत पार्किंग केलेली आहे़ शिवाय, मुला-मुलींच्या वसतिगृहाचा प्रस्तावही शासनाकडे प्रलंबित आहे़ लातूर शहरापासून विद्यापीठ उपकेंद्राचे अंतर १० ते १२ किलोमिटर आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना लातूर शहरातून उपकेंद्रात जाण्यासाठी विद्यापीठाने एक बस दिली आहे़ काही दिवस या बसमधूनच विद्यार्थी उपकेंद्रात जात होते़ मात्र गेल्या एप्रिल महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या बसला चालकच नाही़ त्यामुळे ही बस उपकेंद्राच्या कॅम्पसमध्ये पार्किंग केलेली आहे़ लातूर बसस्थानक, गांधी चौक, रेणापूर नाका, पाण्याची टाकी, शिवाजी चौक व राजीव गांधी चौकात या बसचा थांबा होता़ या थांब्यावरुन विद्यार्थी घेतल्यानंतर बस उपकेंद्रात जात असे़ परंतू आता या बसला चालकच नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाद्वारे उपकेंद्रात जावे लागत आहे़ साध्या चालकाचा प्रश्न विद्यापीठाने गांभिर्याने घेतला नाही़ परिणामी विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे़ सध्या उपकेंद्राच्या तीन संकुलात एमबीएच्या प्रथम वर्गात ३० व द्वितीय वर्षात २०, एम़ए़अर्थशास्त्राच्या प्रथम वर्षात २३ व द्वितीय वर्षात १३, एम़ए़ समाजशास्त्राच्या प्रथम व द्वितीय वर्षाला प्रत्येकी ८, एम़एस्सी़ कॉम्प्युटर सायन्स प्रथम वर्षात २५ व द्वितीय वर्षात १४, एम़एस्सी़बायो़ प्रथम वर्षात १ व द्वितीय वर्षात २, समाजकार्य प्रथम ३६ व द्वितीय २६ असे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ प्रथम वर्षाचा आकडा अधिक असून, द्वितीय वर्षाचा आकडा प्रत्येक अभ्यासक्रमाला कमी झाला आहे़ केवळ उपकेंद्रामध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संस्थेतून काढता पाय घेतला आहे़लातूर शहराची ओळख शिक्षणाची पंढरी म्हणून देशात झाली आहे़ त्यामुळेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरला उपकेंद्र दिले़ लातूर ते नांदेडचे अंतर दीडशे किलोमिटरच्या जवळपास आहे़ वेळ व पैसा तसेच एवढे अंतर काठून किरकोळ कामासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाण्याची गरज पडू नये म्हणून उपकेंद्राची निर्मिती त्यांनी केली़ परंतू हा उद्देश प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सफल होताना दिसत नाही़ बसला साधा चालक मिळू नये हे उपकेंद्राचे मोठे दुर्दैव आहे़