शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

चालकाअभावी उपकेंद्राची बसही धूळ खात

By admin | Updated: August 27, 2015 00:23 IST

हणमंत गायकवाड , लातूर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राला चांगला केअर टेकर मिळाला नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून

हणमंत गायकवाड , लातूरस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राला चांगला केअर टेकर मिळाला नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबरोबर अनेक सुविधांचाही अभाव आहे़ गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसला चालकच नाही़ त्यामुळे ही बस उपकेंद्राच्या परिसरात शोभेच्या वस्तुगत पार्किंग केलेली आहे़ शिवाय, मुला-मुलींच्या वसतिगृहाचा प्रस्तावही शासनाकडे प्रलंबित आहे़ लातूर शहरापासून विद्यापीठ उपकेंद्राचे अंतर १० ते १२ किलोमिटर आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांना लातूर शहरातून उपकेंद्रात जाण्यासाठी विद्यापीठाने एक बस दिली आहे़ काही दिवस या बसमधूनच विद्यार्थी उपकेंद्रात जात होते़ मात्र गेल्या एप्रिल महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या बसला चालकच नाही़ त्यामुळे ही बस उपकेंद्राच्या कॅम्पसमध्ये पार्किंग केलेली आहे़ लातूर बसस्थानक, गांधी चौक, रेणापूर नाका, पाण्याची टाकी, शिवाजी चौक व राजीव गांधी चौकात या बसचा थांबा होता़ या थांब्यावरुन विद्यार्थी घेतल्यानंतर बस उपकेंद्रात जात असे़ परंतू आता या बसला चालकच नाही़ त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाद्वारे उपकेंद्रात जावे लागत आहे़ साध्या चालकाचा प्रश्न विद्यापीठाने गांभिर्याने घेतला नाही़ परिणामी विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे़ सध्या उपकेंद्राच्या तीन संकुलात एमबीएच्या प्रथम वर्गात ३० व द्वितीय वर्षात २०, एम़ए़अर्थशास्त्राच्या प्रथम वर्षात २३ व द्वितीय वर्षात १३, एम़ए़ समाजशास्त्राच्या प्रथम व द्वितीय वर्षाला प्रत्येकी ८, एम़एस्सी़ कॉम्प्युटर सायन्स प्रथम वर्षात २५ व द्वितीय वर्षात १४, एम़एस्सी़बायो़ प्रथम वर्षात १ व द्वितीय वर्षात २, समाजकार्य प्रथम ३६ व द्वितीय २६ असे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत़ प्रथम वर्षाचा आकडा अधिक असून, द्वितीय वर्षाचा आकडा प्रत्येक अभ्यासक्रमाला कमी झाला आहे़ केवळ उपकेंद्रामध्ये सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संस्थेतून काढता पाय घेतला आहे़लातूर शहराची ओळख शिक्षणाची पंढरी म्हणून देशात झाली आहे़ त्यामुळेत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरला उपकेंद्र दिले़ लातूर ते नांदेडचे अंतर दीडशे किलोमिटरच्या जवळपास आहे़ वेळ व पैसा तसेच एवढे अंतर काठून किरकोळ कामासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाण्याची गरज पडू नये म्हणून उपकेंद्राची निर्मिती त्यांनी केली़ परंतू हा उद्देश प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सफल होताना दिसत नाही़ बसला साधा चालक मिळू नये हे उपकेंद्राचे मोठे दुर्दैव आहे़