शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

खरीप पिकांची वाढ खुंटली

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

खरीप पिकांची वाढ खुंटली

जालना : संपूर्ण जिल्ह्यात अपुऱ्या पावसाअभावी खरीप पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटले आहेत. परंतु या जिल्ह्यात ८ आॅगस्टपर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही. वास्तविकता सात जूनपासून सात आॅगस्टपर्यंत म्हणजे दोन महिन्यात या जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत किमान ६० टक्के पावसाचे प्रमाण राहिले आहे. त्या तुलनेत २० टक्के सुद्धा पाऊस नाही. परिणामी अपुऱ्या पावसामुळेच संपूर्ण जिल्ह्यात अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अपुऱ्या पावसामुळेच या जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. सात जूनपासून ते २० जुलैपर्यंत या पेरण्या ठप्प होत्या. चार दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडल्यानंतरच जुलैअखेरपर्यंत खरिपाच्या पेरण्या कशबशा पूर्ण झाल्या. मात्र आता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाअभाची खरीप पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. या आठवड्यात सुरुवातीला दोन चार दिवस ढगाळ वातावरण होते. रिमझिम पाऊस झाला. या पावसाने खरीप पिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र मोठे आहे. कापसाचा पेरा यावर्षीही मोठा आहे. परंतु या वर्षी कापसाच्या लागवडीस मोठा विलंब झाला. उन्हाळी म्हणजे मे अखेर दरम्यान, बड्या शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशीची लागवड केली. त्या कापसाची वाढ समाधानकारक आहे. गुडघ्यापर्यंत तो कापूस पोहचला आहे. पाते व फुलेही कापसास लगडली आहेत. याउलट खोळंबलेल्या पेरण्यांमुळे उशिरा लागवड केलेल्या कापसाची अवस्था भयावह आहे. केवळ पाच इंचापर्यंतच कापसाची वाढ झाली आहे. या कपाशीस पाते, फुले, बोेंड वगैरे फुलली नाहीत. कापसाप्रमाणेच सोयाबीनचे तीच स्थिती आहे. अपुऱ्या पावसामुळेच काही भागात सोयाबीन जमिनीवर सुद्धा आले नाही. सर्वसाधारणपणे वितभरच या पिकाची वाढ झाली असून, सर्वदूर सोयाबीनची वाढ खुंटल्यानेच शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तूर व उडीद या दाळींची अवस्था चिंतनीय आहे. मुळात तूर व उडीदीचा पेराच घटला आहे. त्यातच आता अपुऱ्या पावसामुळे उत्पादनात मोठी घट होणार हे स्पष्ट आहे. बागायती शेतीतील उसाची वाढही खुंटलेली आहे. वास्तविकता नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीतीत लावलेल्या उसास वीस ते बावीस कांड्यांपर्यंत वाढ अपेक्षित असताना सद्य स्थितीत उसाची दहा ते बारा कांड्यांपर्यंत वाढ झाली आहे. केळीचीही वाढ खुंटली आहे. या जिल्ह्यात मोसंबीस मोठा तडाखा बसला आहे. गारपिटीमुळेच मोसंबीतील अंबे बहाराचे मोठे नुकसान झालेले आहे. (प्रतिनिधी)