शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गणेशोत्सवावरही दुष्काळाची छाया

By admin | Updated: August 20, 2014 00:24 IST

आगामी गणेशोत्सवासाठी मूर्तींचे कामही सुरू केले ते तडीस नेले; पण विक्रीची वेळ जवळ आली असताना काळ कोपला. दुष्काळ परिस्थितीमुळे हजारो मूर्तींच्या विक्रीचा यक्षप्रश्न निर्माण झाला.

हिंगोली : काळ बदलला, उत्सवात बदल झाला, साहित्य बदलले, दामही वाढले पण मूर्तीकार आहे त्या ठिकाणीच राहिले. घडविणाऱ्यापेक्षा विकणाऱ्यांचे हात मजबूत झाले. तरीही पिढ्यान् पिढ्यापासून चालत आलेला कलेचा वारसा जपत आगामी गणेशोत्सवासाठी मूर्तींचे कामही सुरू केले ते तडीस नेले; पण विक्रीची वेळ जवळ आली असताना काळ कोपला. दुष्काळ परिस्थितीमुळे हजारो मूर्तींच्या विक्रीचा यक्षप्रश्न निर्माण झाला. हिंगोलीत गणेशमूर्ती बनविण्याचे काम करणारे मोजून चार घरे. आज त्यांची तिसरी पिढी कलेचा वारसा सांभाळते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मृग नक्षत्रापासून मूर्ती बनविण्यच्या कामास प्रारंभ केला. वर्षातील सर्वाधिक काम देणारा उत्सव असल्याने स्वत:चे कुटुंब या कामात ओढले. आता उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने कारागीर दिवसरात्र घाम गाळू लागले. जवळपास सर्व मूर्तीही तयार झाल्या. केवळ रंगरंगोटी राहिली. दरम्यान, पाऊस गायब झाला. खरिपाची पिके वाळण्यास सुरूवात झाली. बाजार थंडावला, आर्थिक उलाढाल घटली. आता तयार केलेल्या मूर्ती विकल्या जातील की नाही, हा प्रश्न उभा राहिला. दिवसेंदिवस कडक उन्हामुळे प्लास्टर आॅफ पॅरीस जरी तातडीने वाळत असले तरी मूर्तीकारांचा हात चालेनासा झाला. अद्यापही ग्राहक मूर्तीकारांकडे फिरकले नसल्याने कारागीर चिंताक्रांत झाले. आजघडीला तयार हजारो मूर्ती विकण्याचे कोडेच निर्माण झाले. कारण साहित्यासाठी गुंतवलेला पैसाही पावसावर अधारित झाला. सुरूवातीला खात्यावर पैसे जमा केल्याशिवाय विक्रेत्यांनी पीओपी पाठवले नाही. साचे तयार करण्याचे साहित्य, नारळाच्या जटा, रबर आदींसाठी मूर्तीकारांना खिसा खाली करावा लागला. मूर्तींसाठी प्रत्येक कारागिरांनी दिवसरात्र एक केला. एवढ्या मेहनतीनंतर तयार मूर्तींना कोणी विचारेनासे झाले. मागील वर्षीसारख्या आॅर्डरही मिळत नाहीत. त्यामुळे आता आखडता हात घेत मूर्तीसंख्या कमी ठेवली. तर आहेत त्या मूर्ती विक्रीसाठी कारागिरांनीही पावसाचा धावा सुरू केला. मूर्तीकारांना गणेश पावणार की नाही, येणाऱ्या काळातील पाऊसच ठरवेल.