शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

पोळ्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST

औरंगाबाद : सर्जा-राजाचा पोळा सण अवघ्या ४ -५ दिवसांवर आलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही, त्यामुळे नदी-नाले, विहिरी जलसाठे जवळपास कोरडे आहेत.

औरंगाबाद : सर्जा-राजाचा पोळा सण अवघ्या ४ -५ दिवसांवर आलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही, त्यामुळे नदी-नाले, विहिरी जलसाठे जवळपास कोरडे आहेत. पावसाळा आता केवळ महिनाभर राहिला असून, दुष्काळाच्या चिंतेने बळीराजा चिंतित झाला आहे; खरीप हंगाम तर गेल्यातच जमा असून चाऱ्याअभावी पशुधनही संकटात सापडले आहे. बाजारही थंडावले आहेत.आतापर्यंत केवळ भीजपाऊस झाला आहे. त्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी; पण त्यानंतर काही ठिकाणी पाऊस झाला नाही, त्यामुळे पिके सुकत आहेत. ज्यांच्याकडे विहिरीत पाणी आहे, अशांची पिके तग धरून आहेत. आता तर गेल्या १५ दिवसांपासून तर भीजपाऊसही नाही, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.खरे तर काही भागांत पोळ्याला शेतकरी आर्थिक व्यवहार पूर्ण करतात. पोळ्यापर्यंत पिके आलेली असतात. यंदा तशी परिस्थितीच नाही. त्यामुळे पोळा दुष्काळाच्या चिंतेने काळवंडला आहे.चिंचोली लिंबाजी, नेवपूर, वाकी, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, वडोद, वाहेगाव, बरकतपूर, रायगाव, वाकद, गणेशपूर, शेलगाव, दिगाव, जामडी, दहीगाव परिसरात चालू हंगामात पावसाने सुरु वातीपासूनच लहरीपणा दाखवला आहे. पावसाअभावी चाराच शिल्लक नसल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साठवून ठेवलेल्या चाऱ्यावर व भुशावर आतापर्यंत जनावरांची गुजराण केली; परंतु आता तोही संपल्याने जनावरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चारा व पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने शेतकरी आपले पशुधन कवडीमोल भावाने बाजारात नेऊन विकत आहेत.बोरगाव बाजार परिसरातही हेच चित्र आहे. बोरगाव बाजार, खातखेडा, मसला, कोटनांद्रा, डिडगाव, पिरोळा आदी गावांत तर महिनाभरापासून पाऊस पडला नाही. पावसाअभावी मका करपत आहे. बोरगाव अर्ज परिसरात पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळा संपत आला तरीही पाऊस नसल्याने टँकरने तहान भागवावी लागत आहे. गुरांसाठी इतर ठिकाणाहून जास्त पैसे देऊन चारा मागवावा लागत आहे. हाताला काम नसल्याने शेतमजूर बसून असून, रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. लासूरगाव परिसरात पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच आहेत ती पिके हरिण फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.