शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पोळ्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST

औरंगाबाद : सर्जा-राजाचा पोळा सण अवघ्या ४ -५ दिवसांवर आलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही, त्यामुळे नदी-नाले, विहिरी जलसाठे जवळपास कोरडे आहेत.

औरंगाबाद : सर्जा-राजाचा पोळा सण अवघ्या ४ -५ दिवसांवर आलेला असताना जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही, त्यामुळे नदी-नाले, विहिरी जलसाठे जवळपास कोरडे आहेत. पावसाळा आता केवळ महिनाभर राहिला असून, दुष्काळाच्या चिंतेने बळीराजा चिंतित झाला आहे; खरीप हंगाम तर गेल्यातच जमा असून चाऱ्याअभावी पशुधनही संकटात सापडले आहे. बाजारही थंडावले आहेत.आतापर्यंत केवळ भीजपाऊस झाला आहे. त्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी; पण त्यानंतर काही ठिकाणी पाऊस झाला नाही, त्यामुळे पिके सुकत आहेत. ज्यांच्याकडे विहिरीत पाणी आहे, अशांची पिके तग धरून आहेत. आता तर गेल्या १५ दिवसांपासून तर भीजपाऊसही नाही, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.खरे तर काही भागांत पोळ्याला शेतकरी आर्थिक व्यवहार पूर्ण करतात. पोळ्यापर्यंत पिके आलेली असतात. यंदा तशी परिस्थितीच नाही. त्यामुळे पोळा दुष्काळाच्या चिंतेने काळवंडला आहे.चिंचोली लिंबाजी, नेवपूर, वाकी, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, वडोद, वाहेगाव, बरकतपूर, रायगाव, वाकद, गणेशपूर, शेलगाव, दिगाव, जामडी, दहीगाव परिसरात चालू हंगामात पावसाने सुरु वातीपासूनच लहरीपणा दाखवला आहे. पावसाअभावी चाराच शिल्लक नसल्याने जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. साठवून ठेवलेल्या चाऱ्यावर व भुशावर आतापर्यंत जनावरांची गुजराण केली; परंतु आता तोही संपल्याने जनावरांना काय खाऊ घालावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चारा व पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने शेतकरी आपले पशुधन कवडीमोल भावाने बाजारात नेऊन विकत आहेत.बोरगाव बाजार परिसरातही हेच चित्र आहे. बोरगाव बाजार, खातखेडा, मसला, कोटनांद्रा, डिडगाव, पिरोळा आदी गावांत तर महिनाभरापासून पाऊस पडला नाही. पावसाअभावी मका करपत आहे. बोरगाव अर्ज परिसरात पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळा संपत आला तरीही पाऊस नसल्याने टँकरने तहान भागवावी लागत आहे. गुरांसाठी इतर ठिकाणाहून जास्त पैसे देऊन चारा मागवावा लागत आहे. हाताला काम नसल्याने शेतमजूर बसून असून, रोजगार हमीची कामे त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. लासूरगाव परिसरात पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच आहेत ती पिके हरिण फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.