शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे ठरू शकते धोकादायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:02 IST

तज्ज्ञांचा सल्ला : वय, वजन आणि आजाराच्या स्वरूपानुसार पाणी पिणे गरजेचे औरंगाबाद : पाणी म्हणजे जीवन, हे आपण शाळेपासून ...

तज्ज्ञांचा सल्ला : वय, वजन आणि आजाराच्या स्वरूपानुसार पाणी पिणे गरजेचे

औरंगाबाद : पाणी म्हणजे जीवन, हे आपण शाळेपासून शिकत आलो आहोत आणि ते अगदीच खरे आहे. पाणी म्हणजे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक होय. निरोगी शरीरासाठी २४ तासात तीन ते साडेतीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच प्रोस्टेड, हृदयरोग, मुत्रपिंडाचा आजाराच्या रुग्णांनीदेखील योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. कारण गरजेपेक्षा जास्त पाणी पिणेदेखील धोकादायक ठरू शकते. वय, वजन आणि आजाराच्या स्वरूपानुसार पाणी पिणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते; मात्र काही लोक प्रमाणाबाहेर पाणी पितात. अनेक जण एकाच वेळी दोन ते तीन ग्लास पाणी पितात. ही बाब शरीरासाठी फायद्याची ठरण्याऐवजी नुकसानदायक ठरण्याची भीती असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या प्रकृतीनुसार, वयानुसार, वजनानुसार आणि आजारांच्या स्थितीनुसार योग्य प्रमाणात पाणी पिले पाहिजे.

शरीरात पाणी कमी पडले तर...

पाणी कमी प्रमाणात पिले तर मुतखडा होण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यावर डिहाइड्रेशन होऊ शकते. व्यक्तीला खूप थकवा जाणवतो. थोडी मेहनत केल्यावरही लगेच थकवा जाणवतो. पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याचदा शरीरात कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होते.

-------

शरीरात पाणी जास्त झाले तर...

गरजेपेक्षा अधिक पाणी पिल्यास वारंवार लघवीला जाण्याचा त्रास सहन करावा लागतो. व्यक्तीची झोप बिघडते. त्याबरोबर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी-अधिक होते. ----

कोणी किती प्यावे पाणी?

१५ वर्षांपर्यंतच्या मुलांनी दिवसभरात साधारण एक लिटर पाणी पिले पाहिजे. तर मोठ्या व्यक्तींनी साधारण तीन ते साडेतीन लिटर पाणी प्यावे. हृदयविकार, मुत्रपिंड विकाराच्या रुग्णांनी २४ तासांत दीड ते दोन लिटर पाणी प्यावे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

------

६० वर्षांनंतर पाणी कमी प्यावे

मोठ्या व्यक्तींनी, तरुणांनी आणि ज्यांना काही आजार नाही अशांनी २४ तासांत तीन ते साडेतीन लिटर पाणी पिले पाहिजे. इतके पाणी पिल्याने मुतखडा होण्याची शक्यता कमी होते. बारीक कण लघवीवाटे निघून जातात. वय वाढल्यानंतर म्हणजे वयाच्या ५० ते ६० वर्षांनंतर पाणी पिणे कमी करावे.

-डाॅ. अभय महाजन, युरोलाॅजिस्ट.

---

२ ते ३ लिटर पाणी पिणे पुरेसे

वय, वजन आणि आजाराचे स्वरूप यावर एखाद्याने किती पाणी प्यावे, हे अवलंबून आहे. कोणाला पाणी कमी पडते, कुणाला जास्त होते; परंतु २ ते ३ लिटर पाणी पिणे पुरेसे ठरते. हृदयविकाराच्या रुग्णांनी पाणी कमी पिले पाहिजे. ज्यांना कोणताही त्रास नाही, अशांनी पुरेशा प्रमाणात पाणी पिले पाहिजे.

- देवदत्त पळणीटकर, युरोलाॅजिस्ट.